ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. इंग्लंडने त्यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. त्याचवेळी इंग्लंडचे माजी कर्णधार व समालोचक नासिर हुसेन यांनी पाकिस्तान संघाबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट पाकिस्तान संघात सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या असते तर, परिस्थिती वेगळी असती असे म्हटले.
मेलबर्न येथे झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडने पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. या अंतिम सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना केवळ 137 धावा करता आलेल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने एक षटक राखून सामना आपल्या नावे करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातलेली.
या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले,
“पाकिस्तानच्या फलंदाजीमध्ये हवी तितकी खोली नाही. अंतिम षटकांमध्ये हे दिसूनही आले. त्यांच्याकडे सूर्यकुमार यादव किंवा हार्दिक पंड्यासारखे फलंदाज नाहीत जे मैदानावर येताच मोठे फटके खेळतील. दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजी शानदार आहे. एका आव्हानात्मक धावसंख्येचा बचाव ते करू शकतात.”
भारतीय संघाबद्दल बोलताना हुसेन म्हणाले,
“भारतीय संघाने ऍडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध एक मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, त्यांनी आक्रमक खेळ दाखवला नाही. भारताला ओएन मॉर्गनसारखा कर्णधार हवा आहे, जो खेळाडूंना मोकळीक देईल.”
भारतीय संघाने संपूर्ण साखळी फेरीत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. मात्र, उपांत्य फेरीत इंग्लंड संघाने भारतीय संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. भारतीय गोलंदाजांना या सामन्यात एकही बळी मिळाला नव्हता. त्यामूळे संघाच्या धोरणांवर टीका होत आहे.
(Nasser Hussain Big Statement On Suryakumar Yadav And Hardik Pandya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘मोठे ऑक्शन होणार आहे’, जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आकडेवारी! मालिकावीर केएल राहुल, सुपर ओव्हर्समध्ये इंडियाचा विजय आणि बरेचं काही