पंजाब किंग्ज संघाने आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे. त्यांनी केवळ 111 धावा करूनही सामना जिंकला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा यशस्वी बचाव करण्यात आला आहे.
सामन्यात कोलकात्या समोर विजयासाठी 112 धावांचे लक्ष्य होते. संघाचे सलामीवीर फलंदाज लवकर बाद झाले. पण अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र, युझवेंद्र चहलने एका षटकात दोन फलंदाजांना बाद करून सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. तो हॅट्ट्रिकही करू शकला असता, पण ती थोडक्यात हुकली.
युझवेंद्र चहलने चार षटकांत फक्त 28 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्याने सुरुवातीला अजिंक्य रहाणे आणि रघुवंशीला बाद केले. नंतर त्याच्या एका षटकात आंद्रे रसेलने दोन षटकार आणि एक चौकार मारला. मग असे वाटत होते की सामना केकेआरच्या बाजूने जाईल, पण तसे झाले नाही. डावाच्या 12व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चहलने प्रथम रिंकू सिंगला बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर रमणदीप सिंग शून्यावर बाद झाला. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत जे केकेआरसाठी सामना जिंकू शकले असते, परंतु दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्याने सामना पंजाबच्या बाजूने गेला.
Chahal once again showed why he is the goated leg spinner at present💥
— Mayank (@MayankJaniMJ) April 15, 2025
IPL is IPLing
WHAT A MATCH🥶
#PunjabKings #Chahal #PBKSvKKR #KKRvsPBKS https://t.co/PcAydFHI7R
हरलेल्या सामन्यात पुनरागमन करून आपल्या संघाला विजयाकडे नेणाऱ्या युजवेंद्र चहलचीही या सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड झाली. त्याच्या अद्भुत कामगिरीमुळे, पंजाब किंग्जने पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यापूर्वी पंजाब संघ सहाव्या स्थानावर होता, परंतु या विजयानंतर पंजाब संघाने आठ गुण मिळवून चौथे स्थान मिळवले आहे.