शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला 336 धावांनी हरवून इतिहास रचला. हा केवळ भारताचाच नाही तर एजबॅस्टन येथे कोणत्याही आशियाई संघाचा पहिला कसोटी विजय आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशा परिस्थितीत माजी कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कोहलीने पहिल्या सामन्याबद्दल काहीही पोस्ट केले नाही, परंतु दुसऱ्या सामन्याच्या शेवटी त्याच्या दोन पोस्ट समोर आल्या. भारताच्या विजयावर प्रतिक्रिया देताना विराट कोहलीने शुभमन गिलसह तीन खेळाडूंचा उल्लेख केला आहे.
विराट कोहलीने एक्सवरील त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एजबॅस्टन येथे भारताचा शानदार विजय. निर्भयपणे खेळलात. शुबमनने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांनी प्रभावी कामगिरी केली. या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याच्या पद्धतीबद्दल सिराज आणि आकाश विशेष कौतुकास पात्र आहेत.” शुबमन गिलने पहिल्या डावात द्विशतक झळकावून 269 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 161 धावा करून इंग्लंडला पराभवाकडे ढकलले. यासह, गिल कसोटीत सर्वाधिक धावा करणारा नॉन-ओपनर फलंदाज बनला.
Great victory for India at Edgbaston. Fearless and kept pushing England to the wall. Brilliantly led by Shubhman with the bat and in the field and impactful performances from everyone. Special mention to Siraj and Akash for the way they bowled on this pitch. ???????????? @ShubmanGill…
— Virat Kohli (@imVkohli) July 6, 2025
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात गोलंदाजी करताना 6 बळी घेतले. आकाशदीप पहिल्या डावात 5 बळी घेण्यापासून एक पाऊल दूर होता, त्याने दुसऱ्या डावात 6 बळी घेऊन त्याची भरपाई केली. आकाशदीपला या सामन्यात एकूण 10 यश मिळाले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर 587 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडला 407 धावा करता आल्या. ज्यामध्ये हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी शतके केली. 180 धावांच्या आघाडीसह, कर्णधाराच्या आणखी एका दमदार शतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात 427 धावांवर डाव घोषित केला आणि यजमानांसमोर 608धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येसमोर इंग्लंडने शरणागती पत्करली आणि संपूर्ण संघ 271 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारताने 336 धावांनी सामना जिंकला.






