माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला आहे. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. तसेच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मोठा पराक्रम केला आहे.
भारत 5 सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेतील सर्व सामने जिंकणारा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला असा पराक्रम करता आला नव्हता.
आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 163 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला 164 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून रोहित शर्माने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुलने 45 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्कॉट कुग्लेइझनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हमीश बेनेटने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 156 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून टीम सेफर्ड आणि रॉस टेलरने अर्धशतकी खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुलने केला हा विक्रम https://t.co/wn5qKu5Ot1#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @klrahul11
— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020
चौथा टी२० सामना जिंकल्यानंतरही टीम इंडियाला आयसीसीने सुनावली शिक्षा, जाणून घ्या कारण
वाचा- ????https://t.co/nsML6hVj3Z????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ICC— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020