---Advertisement---

धोनी नाही, चेन्नईच्या पराभवामागे हे आहे खरे कारण! माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात केली होती. संघाने पहिल्या सामन्यात मुंबईला 4 विकेट्सने पराभूत केले होते. पण त्यानंतर चेन्नई संघाला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2025 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात चेन्नईचा 6 धावांनी पराभव केला. महेंद्र सिंग धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या गोष्टीवर माजी क्रिकेटर दीप दासगुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सीएसकेच्या पराभवावर भाष्य केले आहे.

राजस्थान रॉयल्सने गुवाहाटीमध्ये प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या होत्या. नंतर भावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ फक्त 176 धावा बनवू शकला. चेन्नई संघाला शेवटच्या तीन षटकात जिंकण्यासाठी 45 धावांची गरज होती, तेव्हा महेंद्र सिंग धोनी आणि रवींद्र जडेजा फलंदाजी करत होते. पण ते संघाला जिंकवू शकले नाहीत. चेन्नई संघाच्या पराभवाचे कारण त्यांची फलंदाजी राहिली चेन्नई संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर रचिन रवींद्र फक्त 0 वरच बाद झाला.

माजी खेळाडू दीप दासगुप्ताने चेन्नईच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार ते म्हणाले की, चेन्नईचा टॉप ऑर्डर मागच्या खेळाडूंसाठी खूप काही सोडून पुढे जात आहे. ते शिवम दुबे वर खूप जास्त अवलंबून आहेत. टॉप ऑर्डरच्या कोणत्यातरी एका फलंदाजाला ही जबाबदारी घ्यावी लागेल.

चेन्नई संघाचा टॉप ऑर्डर काही खास करू शकला नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाडला सोडल्यास कोणताही खेळाडू खेळू शकला नाही. राहुल त्रिपाठी फक्त 23 धावा करून बाद झाला. शिवम दुबे 18 तर, विजय शंकर 9 धावा करून परत गेला. चेन्नईच्या पराभवाचे संपूर्ण कारण त्यांची खराब फलंदाजी ठरली. धोनी संघासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला तोही फक्त 16 धावा करून बाद झाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---