क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘तू चल मी आलोच’ असे सामने होतात, ज्यामध्ये एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असतात. परिणामी संघाला कमी धावांवर समाधान मानावे लागते. असाच एक सामना आजच्या (१४ जून) दिवशी झाला होता, तेही विश्वचषक स्पर्धेत. जेव्हा कॅनडा संघातील संपूर्ण फलंदाजांना अवघ्या ४५ धावा करण्यात यश आले होते. हा नकोसा पराक्रम १९७९ मध्ये झाला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत कॅनडा संघाच्या फलंदाजांचा घाम काढला होता.
आजचा दिवस (१४ जून) कॅनडा क्रिकेटसाठी एका वाईट स्वप्नापेक्षा काही कमी नसेल. १९७९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लिश गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर कॅनडा संघातील फलंदाजांना सर्वबाद केले होते. इंग्लंड संघाचे माजी इंग्लिश कर्णधार माईक ब्रियरली यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघात ज्योफ बायकॉट आणि ग्राहम गुचसारखे दिग्गज खेळाडू होते.
विश्वचषक १९७९ मध्ये झालेल्या ८व्या सामन्यात इंग्लंड आणि कॅनडा हे दोन्ही संघ आमनेसामने होते. त्यावेळी वनडे सामना ६० षटकांचा असायचा. या सामन्यात कॅनडा संघाचा कर्णधार ब्रायन मॉरीसेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णतः फसला. कारण संघातील फलंदाजांनी हिंदी चित्रपटातील ‘तू चल मी आलोच’ (तू चल मैं आया) या गाण्याचे वाक्य सत्यात उरवले आले होते. मुख्य बाब म्हणजे अवघ्या ३७ धावांवर कॅनडाचा अर्धा संघ पवेलियनला परतला होता. (On this day in 1979 world cup match Canada all out on 45 runs against England)
यापैकी वरच्या फळीतील तीन फलंदाजांना तर खातेदेखील उघडता आले नव्हते. फक्त फ्रेंकलिन डेनिस याने सर्वाधिक २१ धावांची खेळी केली होती. उर्वरित संघातील खेळाडूंना १० धावा देखील करता आल्या नव्हत्या. तर इंग्लंड संघाकडून ख्रिस ओल्डने ८ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले होते.
कॅनडाच्या ४६ धावांचे आव्हान इंग्लंड संघाने १३.५ षटकात पूर्ण केले होते. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या ओल्डला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा