Parthiv Patel On RCB: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला (RCB) आतापर्यंत एकदाही स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले नाही. असे असले तरी त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. संघासाठी अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेला विराट कोहली (Virat Kohli) या संघाचा पहिल्या वर्षापासून सदस्य आहे. तरीदेखील संघाला आयपीएल ट्रॉफी का जिंकता आली नाही? याबाबत आरसीबीच्या एका माजी खेळाडूने खुलासा केला आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीचा भाग राहिलेला भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने संघाच्या या अपयशाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने, आरसीबी संघात संघभावना नसल्याचे मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला,
“मीदेखील आरसीबी संघाचा भाग राहिलो आहे. त्यांचे आयपीएल न जिंकण्याचे सर्वात मोठे कारण तिथे मोठ्या खेळाडूंना दिला जाणारा मान असू शकते. इथे विराट कोहली, ख्रिस गेल किंवा एबी डिव्हिलियर्स यांच्या वैयक्तिक कामगिरीला आणि प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिले गेले. मी असताना तरी एक संघ म्हणून आम्ही कधी खेळलो नाही. कदाचित हेच कारण संघाच्या अपयशाचे असू शकते. इतर संघात तुम्हाला अशी परिस्थिती अभावाने दिसते.”
आरसीबी संघ पहिल्या आयपीएलपासून नेहमीच विजेतेपदाचा दावेदार राहिला आहे. मात्र, 17 वर्षाच्या काळात ते केवळ तीन वेळा अंतिम फेरी गाठू शकले. तर एकूण सहा वेळा त्यांनी प्ले ऑफ्समध्ये प्रवेश केला आहे. आयपीएल 2024 मध्ये देखील त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. मात्र, अखेरचे सहा सामने जिंकत त्यांनी प्ले ऑफ्समध्ये स्थान मिळवलेले. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत करत पुन्हा एकदा स्पर्धेबाहेर केले.
पुढील वर्षी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. त्यावेळी आरसीबी संघ व्यवस्थापन कशाप्रकारे संघ बांधतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. तत्पूर्वी, ते विराट कोहली, विल जॅक्स व मोहम्मद सिराज या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?