भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामन्यात पराभूत होणे, हे कोट्यावधी भारतीयांसाठी धक्कादायक होते. एकही पराभव न स्वीकारता भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने विजय मिळवला. हा पराबव विसरणे भारतीयांसाठी नक्कीच सोपे नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने दिलेली प्रतिक्रिया भारतीयांच्या वेदना वाढवणारी ठरत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. भारताने या सामन्यात 6 विकेट्सने पराभव स्वीकारला. भारतीय संघाने प्रथम फलंदाज आणि नंतर गोलंदाजीत सुमार प्रदर्शन केले. सुरुवातीच्या तीन विकेट्स भारताने स्वस्तात गमावल्या होत्या. अशात विराट कोहली (Virat Kohli) याच्या रुपात संघाला तिसरा झटका मिळाला. विराटची विकेट महत्वाची असल्यामुळे मैदानात अकदी टाचणी पडल्यानंतर आवाज येईल, एवढी शांतता पसरली होती.
आता विश्वचषकविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने विराटच्या विकेटचा उल्लेख करून भारतीयांच्या जखमेवर एकप्रकारे मिठ चोलळ्याचे दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कमिन्स म्हणाला, “विराट कोहलीच्या विकेटनंतर आम्ही जल्लोष करत होतो. अशातच स्टीव स्मिथ म्हणाला, क्राऊडला ऐका. आम्ही एका क्षणासाठी थांबलो. त्यावेळी मैदानात अगदी ग्रंथालायासाठी शांतता पसरली होती. मैदानात 1,00,000 भारतीय होते, जे शांत बसले होते. पुढचा मोठा काळ मी या क्षणाचा आनंद घेत राहील.”
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकात सलग 10 सामने जिंकला होता. अंतिम सामन्याआधी संघाला एकही पराभव मिळाला नव्हता. पण अंतिम सामन्यात संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. परिणामी 20 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची आलेली संधी संघाला साधता आली नाही. ऑस्ट्रेलियन संघ इतिहासात सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. (Pat Cummins spoke about the situation in the stadium after Virat’s wicket in the World Cup final)
महत्वाच्या बातम्या –
बीड क्रिकेटची शान वाढवणारा सचिन! युएईमध्ये खेळणार टीम इंडियासाठी U19 आशिया कप
अखेर हेजलवूडला संघातून वगळण्याचं कारण समजलं! आरसीबीच्या धाडसी निर्णयामागे आहे ‘हे’ कारण