संपुर्ण नाव- दिप बिप्लब दासगुप्ता
जन्मतारिख- 7 जून, 1977
जन्मस्थळ- कलकत्ता (आताचे कोलकाता), बंगाल
मुख्य संघ- भारत, बंगाल आणि कोलकाता टायगर्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 3 ते 6 नोव्हेंबर, 2001
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 5 ऑक्टोबर, 2001
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 344, शतके- 1
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 51, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-दिप दासगुप्ता हे जरी कोलकाता येथे जन्मले असतील. तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील जास्त वेळ हा भारताची राजधानी दिल्ली येथे घालवला आहे. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. तसेच त्यांची क्रिकेटची सुरुवातही दिल्लीतच झाली.
-दासगुप्ता यांची क्रिकेटची पहिली प्रशिक्षक ही एक महिला होती. त्यांचे नाव सुनिता शर्मा. सुनिता यांनी दासगुप्ता यांच्यातील प्रतिभेला हेरले आणि त्यांची गुरशरण सिंग यांच्याशी ओळख करून दिली होती. सुनिता या भारतीय महिला संघाच्या पहिल्या प्रशिक्षक होत्या. त्यांना पुढे द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला.
-दासगुप्ता यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सलामीवीर फलंदाज म्हणून केली. त्यांनी बडोदाविरुद्धच्या रणजी ट्रॉफीतून क्रिकेटमध्ये पदार्पण करत, पहिल्याच सामन्यात शतक ठोकले होते.
-2001 मध्ये दक्षिण आफ्रिका कसोटी दौऱ्यावर भारताचे यष्टीरक्षक फलंदाज समीर दिघे यांना अचानक झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे दासगुप्ता यांना संघात संधी मिळाली होती. नाणेफेक होण्याच्या एक तासापुर्वी त्यांना ही बातमी मिळाली होती.
-त्याचवर्षी भारतात इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका पार पडली होती. यावेळी इंग्लंडने पहिल्या सामन्यात दासगुप्ता यांनी शतकी खेळी केली होती.
-दासगुप्ता यांची पहिली कसोटी मालिका ही ती मालिका होती, ज्यात माईक डेनिस यांनी भारतीय संघातील 6 क्रिकेटपटूंना एका कसोटीसाठी निलंबीत केले होते. यात दासगुप्ता यांच्यासह सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि शिव सुंदर दास यांचा समावेश होता. यात सचिनला चेंडू छेडछाड प्रकरणामुळे, गांगुलीला संघसहकाऱ्यांच्या वागणुकीला सांभाळता न आल्याने, तर इतरांना त्यांच्या उद्धट वागणुकीमुळे निलबिंत केले गेले होते.
-दासगुप्ता यांनी त्यांची पहिली क्रश अम्रिता यांच्यांशीच लग्न केले.
-दासगुप्ता हे रणजी ट्रॉफीतील बंगाल संघाचे यशस्वी कर्णधार होते. संबरन बॅनर्जी यांच्यानंतर दासगुप्ता हे दुसरेच कर्णधार होते, ज्यांनी बंगाल संघाला रणजी ट्रॉफीच्या सलग 2 हंगामात अंतिम सामन्यांपर्यंत नेले.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर दासगुप्ता हे समालोचक क्षेत्राकडे वळले.