संपुर्ण नाव- मुनाफ मुसा पटेल
जन्मतारिख- 12 जुलै, 1983
जन्मस्थळ- इखर, गुजरात
मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, बडोदा, गुजरात, गुजरात लायन्स, इंडिया ग्रीन, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, महाराष्ट्र, मुंबई, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 9 ते 13 मार्च, 2006
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 3 एप्रिल, 2006
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 9 जानेवारी, 2011
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 13, धावा- 60, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 13, विकेट्स- 35, सर्वोत्तम कामगिरी-4/25
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 70, धावा- 74, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 70, विकेट्स- 86, सर्वोत्तम कामगिरी- 4/29
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/25
थोडक्यात माहिती-
-गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील इखार गावात राहणाऱ्या एक गरिब शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे मुनाफ पटेल.
-मुनाफ वयाच्या 10व्या वर्षापासून त्याच्या वडिलांचा विरोध असतानाही क्रिकेट खेळायचा. तर, दरम्यान सुट्टीच्या काळात जवळच्या टाईल्स फॅक्टरीमध्येही मजुरीचे काम करायचा. तिथे त्याला 8 तासांचे 35 रुपये मिळायचे.
-त्याच्या जवळच्या एका युसुफ भाई या व्यक्तीमुळे त्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी मुनाफला बडोद्यातील क्रिकेट अकॅडमीमध्ये दाखल केले होते. तसेच, त्याला 400रुपयांचे शूजही विकत घेऊन दिले होते.
-वयाच्या 20व्या वर्षी बडोद्यातील अकॅडमीत भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे हे मुनाफच्या खेळीने प्रभावित झाले होते. त्यांनी त्याला चेन्नईतील एमआरएफ फांउडेशनमध्ये दाखल केले होते.
-मुनाफ हा रणजी ट्रॉफीतील गुजरात आणि बडोदा संघाचा महत्वाचा क्रिकेटपटू होता. पुढे सचिन तेंडूलकर यांच्या सांगण्यानुसार त्याने मुंबई रणजी ट्रॉफी संघात प्रवेश केला.
-मुनाफने 2003 साली राजकोट येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. यावेळी त्याने भारत अ संघाकडून खेळताना दोन्ही डावात अनुक्रमे 3/83 आणि 2/22 अशी कामगिरी केली होती.
-2006साली इंग्लंडविरुद्ध त्याला पहिल्यांदा कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी पहिल्या डावात 72 धावा देत 3 विकेट्स त्याने संघाला 38 धावांची आघाडी घेण्यास मदत केली. तसेच पुढील डावात 25 धावा देत 4 विकेट्स घेत त्याने संघाला 9 विकेट्सने तो सामना जिंकून दिला होता.
यासह कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट आकडेवारी घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला.
-मुनाफ हा भारताने जिंकलेल्या 2 विश्वचषकाचा भाग होता. यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील 2007च्या टी20 विश्वचषकाचा समावेश होता.
तसेच 2011च्या विश्वचषकात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले होते. यावेळी संपूर्ण चषकात 11 विकेट्स घेत तो युवराज सिंग आणि झहीर खान नंतर सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज होता.
-तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसह त्याच्या रागीट स्वभावासाठीही ओळखला जातो. मुनाफला 2008ला श्रीलंकाविरुद्धच्या वनडेत पंचाशी वाद घातल्याने सामना फीच्या 75 टक्के शुल्क भरावा लागला होता.
-एवढेच नाही तर त्याने त्याच्या काही महिन्यानंतर इराणी ट्रॉफीत दिल्ली विरुद्ध शेष विश्व संघ सामन्यातही विरेंद्र सेगहवागशी वाद घातला होता. तसेच त्याचे आयपीएलमध्ये अमित मिश्राशीही वाद झाले होते.
-मुनाफ 2008च्या राजस्थान रॉयल्स आणि 2013च्या मुंबई इंडियन्स संघाच्या विजयातील भागीदार होता.
-त्याने 2010मध्ये त्याच्याच इखर गावातील तस्लिमा या मुलीशी विवाह केला.