भारतीय संघाजा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या याने आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी सात सामन्यांमध्ये हार्दिकने संघाला विजय मिळवून दिला. सध्या सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेत देखील हार्दिक कर्णधाराच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत घेतलेल्या काही निर्णयांमुळे हार्दिकवर टीका होत आहे. पण त्याचे कौतुक करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. विराट कोहली याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी देखील हार्दिकच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना लखनऊमध्ये खेळला गेला. भारताने हा सामना एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून जिंकला. हार्दिकच्या नेतृत्वातील संघाने प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडला अवघ्या 99 धावांवर रोखले. पण प्रत्युत्तरात संघ 100 धावा करण्यासाठी झगडताना दिसला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अवघा एक चेंडू शिल्लक असताना चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चांगल्या लयीत दिसत असताना हार्दिकने त्याला फक्त दोन षटके गोलंदाजी दिल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. चहलने टाकलेल्या दोन षटकांमध्ये 4 धावा खर्च केल्या आणि सलामीवीर फिन एलन (Finn Allen) याची महत्वपूर्ण विकेट घेतली.
विराट कोहली (Virat Kohli) याचे लहानपणीचा प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी मात्र हार्दिकने ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले, त्यासाठी त्याचे कौतुक केले. “हार्दिक पंड्या एक अप्रतिम कर्णधार आहे. तो खूप सकारात्मक आहे आणि अडचणीच्या काळात पुढाकार घेतो. जबाबदारी घेताना तो घाबरत नाही. त्याची विचार करण्याची बद्धत खूप चांगली आहे आणि खेळाची त्याला चांगली जाण आहे. तो एक ‘स्ट्रीट स्मार्ट’ क्रिकेटपटू आहे आणि विरोधी संघापेक्षा एक पाऊल पुढे असतो.”
हार्दिक पंड्या मागच्या वर्षी गंभीर दुखापतीशी झगडत होता. याच कारणास्तव त्याने राष्ट्रीय संघातून काही महिने विश्रांती देखील घेतली होती. दरम्यानच्या काळात त्याने आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या काही सामन्यांमध्ये त्याचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. अशा परिस्थितीत विश्रांतीनंतर त्याने गुजरात टायटन्सच्या कर्णधाराच्या रूपात पुनरागमन केले आणि संघाला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. हार्दिने स्वतःच्या प्रदर्शनात ज्या पद्धतीने सुधारणा केली, यासाठीही साजकुमार शर्मांनी त्याचे कौतुक केले.
“हार्दिक पंड्याने त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत केली आहे. तो दुखापतीमुळे मोठा काळ मैदानातून बाहेर होता. कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी दुखापतीनंतर पुनरागमन करणे कठीण असते. तो खूप विश्वासाने गोलंदाजी करत होता आणि 140 किमी ताशी गतीने निरंतरपणे गोलंदाजी करू शकतो. आधी आपण त्याला सुरुक्षित ठेवण्यासाठी जास्त गोलंदाजी करायला लावत नव्हतो, पण आता तो खूप जबरदस्त अष्टपैलू बनला आहे,” असेही राजकुमार शर्मा म्हणाले. ( Rajkumar Sharma’s Statement on hardik Pandya’s captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी स्मिथचा बीसीसीआयवर गंभीर आरोप; म्हणाला,”आम्हाला सामन्यावेळी ते…”