इंडियन प्रिमियर लीगचा (आयपीएल) पंधरावा हंगाम नुकताच २९ मे रोजी संपन्न झाला आहे. यंदाच्या वर्षी नव्याने आलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने आपले नाव आयपीएल ट्रॉफीवर कोरले. गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाला धूळ चारली. या विजयानंतर आपल्या विजयाचे गुपीत उलघडले संघाचा फिरकीपटू राशिद खान याने. राशिदने सामना संपल्यानंतर यशाचे सूत्र सर्वांना सांगितले.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना राशिद खान (Rashid khan) म्हणाला की, “हंगामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत संघातील सर्व खेळाडूंनी योगदान दिले. प्रत्येक खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर आयपीएल जिंकणे हे माझे स्वप्न होते. हे माझे चौथे वर्ष आहे. मला शेवटपर्यंत संघात राहायचे होते आणि मी याविषयी संघाच्या प्रशिक्षकांशीही चर्चा केली आहे. आशिष नेहरा आणि हार्दिक यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली तसतसा संघ अधिकाधिक चांगला होत गेला. प्रत्येक सामन्यात प्रत्येकाने योगदान दिले आहे. त्यामुळे आम्ही चषक उंचावू शकलो.”
“हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) शानदार गोलंदाजीमुळे संघाने राजस्थानला १३० धावांवर रोखले. पंड्याने चार षटकांत १७ धावा देत तीन बळी घेतले. त्याच वेळी शुबमन गिल (Shubhman gill), हार्दिक पंड्या आणि डेविड मिलर (David Miller) यांनी चांगली फलंदाजी केली, ज्यामध्ये आम्ही ११ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला,” असेही गुजरातच्या गोलंदाजीबद्दल बोलताना राशिद पुढे म्हणाला.
दरम्यान, गुजरात समोर राजस्थानने १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १८.१ षटकांत ३ विकेट्स गमावत पूर्ण केला आणि पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे यापूर्वी असा विक्रम केवळ राजस्थान रॉयल्सने केला होता. राजस्थानने २००८ साली पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद जिंकले होते.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा-
गुजरात टायटन्स आयपीएल ट्रॉफी जिंकलंय, पण हा विजय किती खास? पाहा एक बाणात किती रेकॉर्ड केले
गुजरातचे प्रशिक्षक कर्स्टन म्हणातेय, ‘नेहराबरोबर काम करण्याची मजाच वेगळी, तो…’
आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन, Photoतून तुम्हीही घ्या आनंद