नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. विश्वचषकानंतर होत असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व इतर सपोर्ट स्टाफने विश्रांती घेतली आहे. मात्र, या निर्णयावर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली.
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारत चांगले प्रदर्शन करत होता. साखळी फेरीत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने भारतीय संघाने जिंकले. मात्र, उपांत्य सामन्यात मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चाहते संघावर नाराजी व्यक्त करत आहेत. खासकरून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंवर व प्रशिक्षकांवर सर्वांचीच नाराजी दिसून येतेय.
भारतीय संघाच्या प्रभावानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व इतर प्रशिक्षकांनी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून माघार घेत विश्रांती करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण हे संघाशी जोडले गेले आहेत. मात्र, प्रशिक्षकांच्या या निर्णयावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
न्यूझीलंड विरुद्ध भारत या टी20 मालिकेआधी बोलताना शास्त्री म्हणाले,
“मला विचाराल तर प्रशिक्षकांना विश्रांती देणे ही कल्पना मला योग्य वाटत नाही. त्यांना हवी तितकी विश्रांती आयपीएलच्या दोन महिन्यांत मिळते. एक प्रशिक्षक म्हणून मला नेहमी माझे खेळाडू जवळ पाहायला आवडतील.”
रवी शास्त्री हे 2017 ते 2021 असे चार वर्षे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मागील टी20 विश्वचषकानंतर त्यांनी आपले पद सोडलेले. सध्या ते पुन्हा एकदा समालोचनाकडे वळाले आहेत.
(Ravi Shastri Said No Rest To Support Staff)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यूएईच्या गोलंदाजाने केले असे काही कृत्य, ज्यामुळे नेपाळ संघाला मिळाल्या फुकटच्या 5 धावा
भारताची फलंदाजी जुन्या पद्धतीची, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान