ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेला टी विश्वचषक नुकताच संपला. या विश्वचषकात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडच्या हातून पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडचे माजी खेळाडू नासीर हुसेन यांना वाटत आहे की ही भारताची मानसिकता होती, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा स्वीकारावा लागला. या माजी खेळाडूचे मत आहे की भारतीय संघाला इयॉन मॉर्गन सारख्या खेळाडूची गरज आहे, जो खेळाडूंना त्यांच्या स्वभावाप्रमाणे खेळण्याचे स्वातंत्र्य देऊ शकेल. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोकळीक देण्याची गरज आहे,ज्या प्रकारची मोकळीक त्यांना आयपीएलमध्ये मिळते.
नासिर हुसेन यांनी म्हटले आहे की भारतीय संघामध्ये इयॉन मॉर्गन सारख्या व्यक्तीचा गरज आहे, जो खेळाडूंना त्याच्या मनाप्रमाणे खेळण्याची मुभा देऊ शकेल. त्याने खेळाडूंना सांगितले पाहिजे की मैदानात जा आणि 20 षटके जितके पाहिजे तितके फटकेबाजी करा. असे खेळा जसे आयपीएल खेळता. फक्त देशाबद्दल विचार करा आणि दुसऱ्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही 120 धावांवर जरी सर्वबाद झालात, तरी तुम्ही सामन्यात पुनरागमन करु शकता.
द्रविड देखील आहे निशाण्यावर
हुसेन यांनी एका माध्यम संस्थेशी बोलताना सांगितले की राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर संघ काही मालिकांमध्ये बेधडक खेळ केला. मात्र, टी20 विश्वचषकाच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर येताच आपल्या घाबरट स्वभावात पुन्हा खेळायला लागली. भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांमध्ये आक्रमक क्रिकेटचा अवलंब करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे ढासाळली आणि काही फलंदाज तर सपशेल अपयशी ठरले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हे खेळाडू सोडले तर कोणालाही फारशी छाप टाकता आली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना
‘धोनीमुळे भारतीय संघाची ताकत वाढेल’, माहीचे पाकिस्तानी दिग्गजाकडून गुणगान