गतवर्षी डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाने विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून वनडे संघाचे नेतृत्त्वपद (Virat Kohli ODI Captaincy) काढून घेतले होते. कोहलीला वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरून काढून टाकल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये वाद होणे स्वाभाविक होते. त्यातही कोहलीने पत्रकार परिषेदत केलेल्या विधांनावरून हा वाद अजूनच पेटला होता. कोहलीने पत्रकार परिषदेदरम्यान बरेच खुलासे केले होते. यादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीं (Sourav Ganguly)च्या एका विधानाच्या विरोधाभासी भाष्य त्याने केल्याने हा विवाद वाढला होता. आता या प्रकरणात भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची एन्ट्री झाली आहे.
शास्त्रींचे म्हणणे आहे (Ravi Shastri On Kohli-Ganguly Controversy) की, कोहलीने आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे आता गांगुलीने आपले मत मांडण्याची वेळ आहे.
…दोन्ही बाजूंनी संवाद होणे गरजेचे
शास्त्रींनी इंडियन एक्सप्रेसच्या एका व्हिडिओ मुलाखतीत म्हटले की, “या प्रकरणाला चांगल्या संवादाद्वारे हाताळले जाऊ शकले असते. हे प्रकरण सार्वजनिक होण्यापूर्वी जर त्यांच्यामध्ये संवाद झाला असता, अजून चांगले झाले असते. विराट कोहलीने त्याची बाजू मांडली आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि आपली बाजू सर्वांपुढे ठेवायला पाहिजे. प्रश्न हा नाहीये की, कोण खोटे बोलत आहे आणि खरे. आम्हाला फक्त सत्य ऐकायचे आहे आणि मला वाटते की, सत्य फक्त संवादातूनच पुढे येऊ शकते. दोन्ही बाजूंनी संवाद होणे गरजेचे आहे. त्यातील एका पक्षाने तर आपले म्हणणे सर्वांपुढे ठेवले आहे.”
विराट आणि माझं आहे खूप चांगलं नातं
शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना त्यांच्यावर कर्णधार कोहलीच्या हो ला हो म्हणण्याचे आरोप होत असायचे. यावर शास्त्री म्हणाले की, “मी अशा गोष्टींना महत्त्व देत नाही. लोकांना आपले मत मांडण्याचा, लिहिण्याचा आणि अंदाज लावण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण याचा अर्थ असा नाही की, मीही यामध्ये सहभागी व्हावे. कोहली आणि माझे नातेसंबंध खूप चांगले आहेत. आम्ही समान विचारधारेच्या २ प्रोफेशनल लोकांप्रमाणे काम करत असायचो.”
“एका संघ प्रशिक्षकाच्या रूपात सर्वात कठीण काम आहे की, संघाची निवड करणे. पण जी ७ वर्षे मी या गोष्टीत सहभागी होतो, त्यामध्ये संघांमध्ये एखाद्या खेळाडूला निवडण्यासाठी माझा कोणता विशेष अजेंडा नसायचा. जेव्हा मला वाटायचे की, एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तो संघासाठी उपयोगी ठरले आणि त्याचा अनुभव पाहून मी कर्णधार आणि संघ व्यवस्थापकांशी याविषयी बोलायचो. मी नेहमी संघाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत असायचो,” असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! सलग २० वर्षे ‘हा’ गोलंदाज कसोटीत घेतोय किमान एकतरी विकेट; नावावर झालाय मोठा विक्रम
नावासाठी लखनऊ फ्रेंचायझीने लढविली अनोखी शक्कल! चक्क शेक्सपिअरला ठरविले खोटे
हेही पाहा-