बुधवारी (दि. 19 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 26वा सामना राजस्थान रॉयल्स वि लखनऊ सुपर जायंट्स संघात जयपूर येथे पार पडला. राजस्थानचा गड मानल्या जाणाऱ्या सवाई मानसिंग स्टेडिअमवरील सामन्यात लखनऊने 10 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानला पराभूत व्हावे लागले असले तरी, राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन राजस्थानच्या पराभवाची एक प्रकारे भविष्यवाणी केली होती.
जयपूरच्या फिरकी गोलंदाजांना मदतगार असलेल्या या खेळपट्टीवर लखनऊच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत 155 धावांचा बचाव केला. राजस्थानच्या आक्रमक फलंदाजी पुढे त्यांचे हे कार्य मोठे मानले जात आहे. मात्र, लखनऊच्या फलंदाजीनंतरच प्रतिक्रिया देताना रविचंद्र अश्विन याने हे आव्हान सोपे नसल्याचे म्हटले. अश्विन म्हणाला,
“गोलंदाजी चांगली झाली. मात्र, आम्ही अजून हुशारीने गोलंदाजी केली असती तर दहा धावा अधिकच्या झाल्या नसत्या. मात्र, नक्कीच आम्ही या धावा पार करू.”
अश्विनने ज्याप्रकारे हा अंदाज व्यक्त केला. त्याप्रमाणे राजस्थानला केवळ 10 धावांनीच पराभव पत्करावा लागला. सोशल मीडियावर त्याचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेचा विषय बनले.
या सामन्याचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावा केल्या. त्यांच्यासाठी कायले मेयर्सने अर्धशतक झळकावले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी दिली. मात्र, त्यानंतर इतर फलंदाजांना अपयश आल्याने राजस्थान संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावाच करता आल्या. त्यामुळे लखनऊने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला.
(Ravichandran Ashwin Statement Goes Viral After Rajasthan Royals Defeat At Sawai Mansingh Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील अंडररेटेड आणि सर्वोत्तम खेळाडू कोण? विराटने घेतली दिग्गजांची नावे
राजस्थानला पराभूत केल्यानंतर राहुलचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘मी कर्णधार म्हणून काहीतरी चुकीचं…’