जयपूर। शनिवारी सुरु असलेल्या राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध राजस्थान राॅयल्स सामन्यात जर बेंगलोर राजस्थानने दिलेले लक्ष १५.५ षटकांत पार केले तर त्याचा नेट रनरेट हा मुंबईपेक्षा जास्त होऊ शकतो. राजस्थानने २० षटकांत ४ बाद १६३ धावा केल्या आहेत.
या धावा जर राॅयल चॅलेंजर बेंगलोरने १५.५ षटकांत पार केल्या तर त्यांचा नेट-रनरेट हा +०.३८४ पेक्षा जास्त होईल. +०.३८४ हा सध्याचा मुंबईचा नेट-रनरेट आहे.
जर असे झालेच तर मुंबईला शेवटच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल शिवाय बेंगलोरपेक्षा जास्त सरासरी राखावी लागणार आहे.
आजच्या सामन्यात बेंगलोरने फक्त विजय मिळवला आणि कोलकाता जर हैद्राबाद विरुद्ध पराभूत झाले तर बेंगलोर थेट प्ले-आॅफला पात्र ठरणार आहे.
त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांचे संपुर्ण लक्ष हे आज होत असलेल्या दोन्ही सामन्यांकडे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण ठार
-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!
–या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके
–मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात