भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ईशान डिसेंबर 2023 पासून भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये. भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अपेक्षित होते. पण सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी 2024 मध्येही त्याने सहभाग घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर त्याच्यावर होणाऱ्या टीका चांगल्याच वाढल्या. अशातच आता रणजी ट्रॉफीमध्ये ईशान न खेळण्याचे कारण समोर येत आहे.
भारतीय संघातून बाहेर असेलल्या सर्व खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळावी, अशा सुचना भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी रणजी ट्रॉफी संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. पण ईशान किशन (Ishan Kishan) मात्र या सुचनेनंतर देखील रणजी हंगामात खेळला नाही. अशात त्याच्या अडचणी भविष्यात वाढणार, असे बोलले जात आहे. पण ताज्या माहितीनुसार ईशान किशन याने आगामी टी-20 विश्वचषकासाठी रणनीती तयार केली आहे. याच कारणास्तव तो रणजी हंगामात देखील खेळला नाहीये.
माध्यमांतील वृत्तांनुसार ईशान डी वाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या टी-20 टूर्नामेंटमधून पुनरागमन करणार आहे. यासाठी तो बीसीसीआयकडे ना-हरकत प्रमाणपत्र देखील मागणार आहे. सुत्रांच्या हवाल्याने बातम्यांमध्ये असे सांगितले गेले आहे की, “तो बोर्डाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मागणार आहे. स्पर्धेत तो भारतीय रिजर्व बँकेसाठी खेळेल. आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करून त्याला भारतीय संघातही स्थान मिळवायचे आहे. विश्वचषकाला अजून वेळ आहे. पण खेळण्याची भूक पुन्हा जागी झाली आहे. त्याला भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे.”
“ईशानने नेहमीच रणझी ट्रॉफीला प्राथमिकता दिले आहे. 2022-23 मध्ये तो नेहमीच भारतीय संघासोबत प्रावस करत राहिला. या व्यस्त वेळापत्रकातही त्याने रणजी ट्रॉफीचे काही सामने खेळले होते. केरळविरुद्धच्या सामन्यात शतक देखील केले होते. याच प्रदर्शनामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळवताना मदत झाली होती,” अशी माहितीही सुत्रांकडून पुढे मिळाली. (Real reason behind Ishan Kishan not playing in Ranji Trophy understood)
महत्वाच्या बातम्या –
नको रोहित नको! कर्णधाराच्या ‘या’ निर्णयावर चाहते नाराज, स्टॅन्डमधील व्हिडिओ होतोय व्हायरल
बिग ब्रेकिंग! विराटपेक्षाही जास्त सरासरी असलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला गुडबाय