---Advertisement---

“मी त्याला एक चांगला क्रिकेटर बनवण्यासाठी…”, रिकी पाँटिंगने केला या क्रिकेटरबद्दल खळबळजनक खुलासा

On: रविवार, जुलै 28, 2024 4:31 PM
Ricky-Ponting-And-Prithvi-Shaw
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने भारतीय खेळाडूबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे, ज्याबद्दल तो खूप निराश आहे. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत पॉन्टिंगने पृथ्वी शॉबद्दल बोलला आहे. अलीकडेच पाँटिंगने स्वतःला दिल्ली कॅपिटल्स संघापासून वेगळे केले आहे. पृथ्वी शॉच्या कामगिरीत सुधारणा करू न शकल्याने निराश झाल्याचे पाँटिंगने मुलाखतीत सांगितले आहे. आपल्या मुद्द्यात पाँटिंग म्हणाला, “तो आजपर्यंत आपल्या खेळात सुधारणा करू शकला नाही. हे असेच सुरू राहिले तर त्याला इतर पर्यायांचा शोध सुरू करावा लागेल.”

माजी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक पुढे म्हणाला, मला असे म्हणायचे आहे की मला वैयक्तिक खेळाडूंबद्दल बोलणे आवडत नाही, परंतु पृथ्वी ही वेगळी बाब आहे. बघा, तो असा खेळाडू आहे ज्याला प्रत्येक संघाला त्यांच्या संघात ठेवायला आवडेल. त्याच्याकडे असलेल्या कौशल्यामुळे तो संघांची पहिली पसंती आहे. त्याला एक युवा खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावले. आणि या वर्षी आम्ही त्याला आमच्या दिल्ली कॅपिटल्स संघात स्थान मिळवू शकलो नाही. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी हे निराशाजनक आहे की मी काही खेळाडूंना चांगले बनवू शकलो नाही आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही.”

रिकी पॉन्टिंगने आपला मुद्दा पुढे नेत म्हणाला, “जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही खेळाडूंना चांगले बनवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला इतर खेळाडू शोधावे लागतील जे तुमच्यासाठी चांगले करू शकतील, मी विशेषतः त्याच्यावर खूप प्रेम करतो. मी त्याला एक चांगला क्रिकेटर बनवण्यासाठी खूप मेहनत केली पण तसे होऊ शकले नाही. रिकी पुढे बोलताना म्हणाला, “तो अजूनही तरुण आहे. तो अजूनही एक अतिशय प्रतिभावान युवा खेळाडू आहे. आशा आहे की एक दिवस त्याला समजेल, आणि सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होण्यासाठी त्याला काय हवे आहे ते शोधून काढेल. 

पृथ्वी शॉच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, या प्रतिभावान फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये शॉने 1 कसोटीत 2 अर्धशतके झळकावण्यात यश मिळवले आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शॉने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. शॉ भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक सामना खेळण्यात यशस्वी ठरला आहे. पृथ्वीने 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

हेही वाचा-

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना दिले प्रोत्साहन, ‘मन की बात’मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचा उल्लेख
“हार्दिक पांड्याला कर्णधार न करण्याचा निर्णय योग्य” माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---