मागील काही काळापुर्वी विराट कोहली याने (Virat Kohli) कसोटी कर्णधारपद सोडले यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी कर्णधार बनवण्यात आले. सध्या मोहालीमध्ये भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचा पहिला सामना सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्या डावात रोहित शर्माने नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना आहे. परंतु, रोहित या सामन्याच्या पहिल्या दिवशी काही खास कामगिरी करु शकला नाही.
भारताकडून रोहित आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) प्रथम सलामीला आले. रोहित २८ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने २९ धावा करुन बाद झाला. त्याला लाहिरु कुमाराने बाद केले.
या कसोटी मालिकेवेळी झालेल्या लंच ब्रेकमध्ये भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी रोहित शर्माच्या विकेटचे विश्लेषण केले आहे. बांगर यांनी मागील वर्षीच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीवीराच्या शानदार कामगिरीची आठवण करून दिली आणि भारतीय कर्णधाराने तसेच आत्मनियंत्रण दाखवण्याची गरज असल्याचे सुद्धा सांगितले आहे.
भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “इंग्लंड मालिकेदरम्यान त्याने ज्याप्रकारे बाहेरील चेंडूंविरुद्ध संयम दाखवला त्यावरून समजते की तो आपल्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवू शकतो, मग याचा अर्थ असा असला तरी की, तो यापुढे आपला आवडता शॉट खेळू शकत नाही. या डावात त्याने एका षटकात दोन चौकार आणि पुढच्या षटकात आणखी दोन चौकार मारले, त्यामुळे तो बाऊन्सवर अवलंबून राहिला.”
बांगर पुढे म्हणाले की, रोहितला त्याच्या शॉट-निवडीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. ते म्हणाले, “तो मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जातो. तो ३०-४० धावांवर खूश होणार नाही, म्हणून त्याला त्याच्या शॉट्सचे विश्लेषण करावे लागेल. त्याला सातत्याने सीमारेषेकडे शाॅट खेळायचे की आक्रमक व्हायचे याचा विचार करावा लागेल.”
पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर भारताने ८५ षटकात ६ बाद ३५७ धावा केल्या. भारताकडून रिषभ पंतने ९७ चेंडूत ९६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने २७, विराट कोहलीने ४५, मयंक अगरवालने ३३ तर हनुमा विहारीने ५८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट”
राजस्थानच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी ‘या’ क्रिकेटरची नियुक्ती; तयार करणार ‘रॉयल’ खेळाडू
फिरकीचा जादूगार गेला! आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली