---Advertisement---

IND vs AUS; ‘रोहित शर्मा’ला विश्रांती की खराब फॉर्ममुळे प्लेईंग 11 मधून वगळले?

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2025 8:10 AM
---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चार सामने खेळले गेले आहेत. या मालिकेतील शेवटचा सामना आज 3 जानेवारी 2025 पासून सिडनी येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असताना स्वतःला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या या निर्णयाने प्रत्येक भारतीय चाहत्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या मालिकेत टीम इंडिया कठीण परिस्थितीत आहे. तर रोहित शर्माने शेवटच्या कसोटी सामन्यात विश्रांती घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. बुमराहने टॉसदरम्यान सांगितले की, रोहित शर्माने स्वत:ला विश्रांती दिली आहे, पण चाहत्यांना यावर विश्वास बसला नाही. खरंतर या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. त्यादरम्यान टीम इंडियाने बुमराहच्या नेतृत्वाखाली सामना जिंकला होता, मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर टीम इंडियाला एकही सामना जिंकता आला नाही. दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली, तिसरी कसोटी सामना अनिर्णित राहिली, तर चौथी कसोटीही ऑस्ट्रेलियन संघाने जिंकली. अशा परिस्थितीत रोहित शर्माने विश्रांती घेणे चाहत्यांना खटकत आहे. विश्रांती पेक्षा त्याला वगळले गेल्यासारखे वाटत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकला होता. त्यादरम्यान देशभरातील चाहत्यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे आणि खेळाचे कौतुक केले. मात्र, विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत हेच चाहते त्याला भारतीय कसोटी संघातून काढून टाकण्याची मागणी करत आहेत. ते असो, रोहित शर्माने कर्णधार आणि फलंदाज म्हणून अत्यंत खराब कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे. बीजीटी 2024-25 मध्ये त्याने 5 डावात फक्त 31 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचा अंत अगदी जवळ आल्याचे दिसते.

या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा निवृत्त झाला तर मेलबर्न कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी असेल. 2014 साली भारतीय कर्णधार एमएस धोनीनेही असेच काहीसे केले होते. 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या मेलबर्न कसोटीनंतर एमएस धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जो चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. एमएस धोनीही त्यावेळी खराब फॉर्ममधून जात होता. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला त्या मालिकेत सामना जिंकता आला नव्हता. रोहित शर्मासोबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे.

हेही वाचा-

IND vs AUS: रोहित बाहेर, या अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
बीसीसीआयमध्ये जय शाह यांची जागा कोण घेणार? सचिवपदाच्या शर्यतीत हे नाव आघाडीवर
शुबमन गिलसह भारताचे चार क्रिकेटपटू अडचणीत, होऊ शकते अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---