भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारताला 28 धावांनी पराभव मिळाला होता. अशात मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा असेल. कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी देखील विशाखापट्टणम कसोटी महत्वाची ठरू शकते. रोहितने याठिकाणी खेळेलेल्या शेवटच्या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगला खेळला. पण शेवटच्या डावात फलंदाजांना लक्ष गाठता आले नाही. रोहितचे वैयक्तिक प्रदर्शन देखील साधारन राहिले. त्याने हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात 25, तर दुसऱ्या डावात 39 धावांची खेळी केली होती. पण विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर रोहितची बॅट पुन्हा एकदा तळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने याठिकाणी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात 300 धावा कुटल्या होत्या.
विशाखापट्टणममध्ये शेवटचा कसोटी सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2019 मध्ये केळला गेला होता. या सामन्यात रोहितने पहिल्या डावात 173, तर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या होत्या. या एकाच सामन्यात त्याने 300 धावा केल्या होत्या. रोहितला या सामन्यातील जबरदस्त प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार देखील मिळाला होता. भारताने या सामन्यात 207 धावांच्या अंतराने मोठा विजय मिळवला होता. सलामीवीर मयंक अगरवाल यानेही या सामन्याच्या महत्वपूर्ण धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मयंकने 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात मात्र त्याने अवघ्या 7 धावांवर विकेट गमावली.
असे असले तरी, रोहितचा 2019 मधील फॉर्म आणि सध्याचा फॉर्म वेगळा आहे. तसेच यावेळी विरोधात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड संघ आहे. अशात भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्माचे प्रदर्शन पाहण्यासारखे ठरू शकते. वायझॅक स्टेडियमवर रोहितने पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडला, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नसेल. (Rohit Sharma scored 300 runs in the last match played in Visakhapatnam)
महत्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!
IND vs ENG । अश्विन पार कडणार तीन मैलाचे दगड, ठरणार ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय