Rohit Sharma ODI World Cup 2027 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या फलंदाजीने तसेच नेतृत्वाने सर्वांचे मन जिंकले. यासोबतच त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने टी20 विश्वचषक देखील जिंकला. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित तंदुरुस्त राहिला तर 2027 विश्वचषक देखील खेळू शकतो, असे विधान केले. मात्र, यावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू व माजी निवड समिती अध्यक्ष के. श्रीकांत यांनी विरोधी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित शर्माच्या भवितव्याबद्दल महत्त्वाचे विधान केले. रोहित व विराट यांच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी असल्याचे त्यांनी म्हटलेले. तसेच त्यांच्या तंदुरुस्तीवर ते 2027 वनडे विश्वचषक खेळतील असे देखील त्यांनी सांगितले. मात्र, श्रीकांत या मताशी सहमत नाहीत.
आपला मुलगा अनिरुद्ध याच्या सोबत एका पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले,”मला वाटते की रोहितने 2027 विश्वचषक खेळू नये. तो तिथे बेशुद्ध पडेल.” याच मुलाखतीत श्रीकांत यांनी विराट कोहली याला चॅम्पियन खेळाडू म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर रोहितच्या चाहत्यांनी श्रीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
रोहित याला 2011 वनडे विश्वचषकात देखील जागा मिळाली नव्हती. विशेष म्हणजे त्यावेळी श्रीकांत हेच निवडसमिती अध्यक्ष होते. सध्या रोहित हा भारताच्या वनडे व कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ पुढील वर्षी चॅम्पियन ट्रॉफी व पात्र ठरल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामना खेळेल. या स्पर्धेतील निकाल काय लागतात, यावर रोहित भारतीय संघाचा कर्णधार राहणार का हे बऱ्यापैकी अवलंबून असण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषकानंतर रोहित व विराट यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
हेही वाचा –
जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!
आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान
खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं