भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज रविवारी खेळला जाईल. हा सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर रंगणार आहे. सध्या भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने कटकमध्ये मैदानात उतरेल. पण कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्मा कटकमध्ये पुनरागमन करू शकेल का? आपल्याला भारतीय कर्णधाराची जुनी शैली पहायला मिळेल का? खरं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत रोहित शर्माचा रेकॉर्ड खूपच लज्जास्पद राहिला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा असा विश्वास आहे की रोहित शर्मावरील दबाव स्पष्टपणे दिसून येतो, परंतु याशिवाय, रोहित शर्माची मजबूत बाजू त्याची कमकुवत बाजू बनली आहे. खरंतर, रोहित शर्माने त्याच्या पुल शॉट आणि फ्लिक शॉटने सर्वोत्तम गोलंदाजांना फटकारले आहे, पण आता हेच शॉट्स भारतीय कर्णधाराला त्रास देत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वानखेडे कसोटीपासून, रोहित शर्मा त्याचा आवडता शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना 10 पैकी 6 वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. यादरम्यान, पुल शॉट व्यतिरिक्त फ्लिक शॉट किंवा चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना रोहित शर्माने आपली विकेट गमावली.
भारत-इंग्लंड यांच्यात रविवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ कटकमधील बाराबती स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतीय संघाने कटकमध्ये 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 13 सामने जिंकले आहेत. भारताने या मैदानावर जवळजवळ 22 वर्षांपूर्वी शेवटचा एकदिवसीय सामना गमावला होता. परंतु तेव्हापासून विजयाची मालिका सुरूच आहे.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्राॅफीपू्र्वी संघाला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज बाहेर
चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकण्यापेक्षा भारताला हरवणे महत्वाचे, पहा काय म्हणाले पाकिस्तानचे PM?
IND vs ENG; दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळणार का?