भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सिंहाचा वाटा उचलला. भारतीय संघाने हा विजय मिळवला असला तरी भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र भारतीय संघ अशा परिस्थितीतून बाहेर येईल असा विश्वास भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि तब्बल 22 महिन्यांपूर्वी व्यक्त केलेला.
या सामन्यात केवळ दोनशे धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्या षटकातच ईशान किशनची विकेट गमावली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनीही तंबूचा रस्ता पकडला. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 2 धावा अशी होती. त्यामुळे भारतीय संघ पराभूत होतो काय अशी भीती निर्माण झालेली. परंतु भारतीय संघाने यातून मार्ग काढत विराट कोहली व राहुल यांच्या अर्धशतकांमुळे विजय मिळवला. परंतु, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल याबाबत भारतीय कर्णधार रोहित शर्मा ने 22 महिन्यांपूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती.
रोहितने डिसेंबर 2021 मध्ये भारतीय संघाच्या आयसीसी स्पर्धांमधील तयारीविषयी बोलताना म्हटले होते की,
“संघाला खराब सुरुवात मिळाली तर त्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. आपली मधली फळी इतकी सक्षम हवी की, 10 धावांवर तीन गडी जरी बात झाले असले तरी आपण त्यातून उभारी घेऊ शकू.”
रोहितचा हाच विश्वास या सामन्यात विराट व राहुल यांनी सार्थ करून दाखवला. भारतीय संघ विश्वचषकातील आपला दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. हा सामना दिल्ली येथे होईल.
(Rohit Sharma Words In 2021 True At Chepauk Virat Rahul Batted Well)
महत्वाच्या बातम्या –
सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराटचा Gold Medal ने सन्मान, पण का दिले पदक? पाहा व्हिडिओ
टॅलेंटेड रचिनचा टॉप फॉर्म कायम! सलग दुसऱ्या सामन्यात चोपली विरोधी गोलंदाजी, केल्या इतक्या धावा