भारत आणि वेस्ट इंडीज संघात बुधवारपासून (12 जुलै) दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. पहिला सामना डॉमनिकाच्या बिंडरसन पार्कवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने याठिकाणी शेवटचा कसोटी सामना 2011 मध्ये खेळला होता. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते, असेच यापूर्वीचे आकडे सांगतात. पण भारतीय संघ या सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांसह खेळणार, असे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्मा याला प्रश्न विचारल्यानंतर कर्णधाराने स्पष्ट उत्तर दिले.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल पदार्पण करणार असेही कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडून समजले. तसेच शुबमन गिल (Shubman Gill) संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असून, त्याची स्वतःची इच्छा असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला, असेही रोहितने सांगितले. सोबत संघ या सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांना खेळवणार असल्याचेही रोहित म्हणाला. मात्र, वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज का खेळवत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. याच पार्श्वभूमीवर रोहितला भारताच्या वेगवान गोलंदाजांविषयी प्रश्न विचारला गेला.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रोहित शर्मा असे म्हटला होता की, आता संघाला जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत खेळण्याची सवय झाली आहे. पण आता हाच कर्णधार रोहित संघाकडे गोलंदाजांची कमी असल्याचे मान्य करताना दिसला. माध्यमांसमोर रोहित शर्मा म्हणाला की, “आपण पाहिले आहे की, वेगवान गोलंदाजांनी याठिकाणी खूप विकेट्स घेतल्या आहेत. पण आता जे आहे ते आहे, खेळाडूंना दुखापत होत असते आणि आम्हाला त्यांना रोटेट करावे लागते. आमच्याकडे वेगवान गोलंदाजांचा लाईन लागली नाहीये. भारतात खूपसारे गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. संघाकडे हे खेळाडू आहेत, पण त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. हेच एक कारण आहे की, आमचे अनुभवी गोलंदाज वेस्ट इंडीज दौऱ्यावर येऊ शकले नाहीत.”
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलै यादरम्यान खेळली जाईल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलैदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जाईल. कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. (Rohit Sharma’s comment about fast bowlers in Indian team)
महत्वाच्या बातम्या –
मालिका गमावली, पण तिसऱ्या टी20त श्रीलंकेने घडवला इतिहास; न्यूझीलंडच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड
कर्णधार रोहितला पुणेकर ऋतुराजची फुल गॅरेंटी, तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलंय…’