धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेती शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर 4-1 च्या फरकाने आपल्या नावावर केली आहे. त्यानंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. भारताच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणार आहे.
याबरोबरच या योजनेंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणार आहे. बीसीसीआयची ही घोषणा कालपासून चर्चेत आहे. यावर आता रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयच्या प्रोत्साहन योजनेबाबत त्याने ट्विट केले आहे. तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने ट्विटरवर बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआयला टॅग करताना ही प्रतिक्रिया देत . तो म्हणाला आहे की, ‘कसोटी क्रिकेट हे अंतिम स्वरूप होते आणि कायम राहील. कसोटी क्रिकेटला चालना मिळत आहे, हे पाहून मला खूप बरे वाटत आहे.’ तो पुढे म्हणाला की, कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे.
अशातच अलिकडे टी-20 आणि आयपीएलने चाहत्यांना रोमांचक सामन्याची सवय लावली आहे. त्यामुळे चाहत्यांना असे सामने पाहायला आवडतात, ज्यात भरपूर धावा केल्या जातात. ज्या सामन्यांमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो. आयपीएल सुरू झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ही मागणी वाढू लागली आहे. यामुळे आयपीएलच्या धर्तीवर जगभरात डझनभर लीग खेळल्या जाऊ लागल्या आहेत.
Test cricket was & will be the ultimate format and it’s great to see @BCCI & @JayShah leading the way in prioritizing Test cricket. https://t.co/bEZpBAt6Ck
— Rohit Sharma (@ImRo45) March 10, 2024
दरम्यान, आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्माने त्याचे कौतुक केले आहे. तसेच बीसीसीआयच्या या घोषणेमुळे कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू एक सामना खेळून चार पट पैसे कमवू शकतात. बीसीसीआयच्या या घोषणे त्या खेळाडूंनाही धडा शिकवण्याचे काम केले, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने देशांतर्गत क्रिकेट खेळत होते. यामुळे बीसीसीआयच्या या योजनेमुळे अशा खेळाडूंना धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-