भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जास्त धावा करू शकला नाही आणि तो फ्लॉप ठरला. त्याचवेळी भारतीय संघ केवळ 153 धावांवरच सर्वबाद झाला. याबाबत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यानी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, “केएल राहुल खूप हळू खेळला आणि त्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आली आणि ऑलआऊट झाला”.
केपटाऊन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्या घातक गोलंदाजीसमोर प्रोटीज संघ पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत सर्वबाद झाला. सिराजने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 6 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाची फलंदाजीही चांगली झाली नाही आणि भारतीय संघाला केवळ 153 धावा करता आल्या. एके काळी भारताची धावसंख्या 153/4 होती, पण त्यानंतर संघाने एकही धाव न करता आपले उर्वरित सहा विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट्स गमावून 62 धावा केल्या असून अजूनही भारतापेक्षा 36 धावांनी पिछाडीवर आहे.
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या म्हणण्यानुसार, केएल राहुल (KL Rahul) एवढा हळू खेळला नसता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना तो म्हणाला, “तुम्हाला तुमचे शॉट्स खेळायचे आहेत. केएल राहुल अतिशय हळू खेळत होता. एवढा हळू खेळला तर फार काळ टिकू शकणार नाही. असे म्हणता येईल की, केएल राहुलच्या या दृष्टिकोनामुळे दक्षिण आफ्रिकेला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.”
केएल राहुलने पहिल्या डावात अतिशय संथ फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 8 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार मारला. (IND vs SA As Team India bowled out for 153 runs former legend reacts bitterly says Because of KL Rahul)
हेही वाचा
मोठी घोषणा: रणजी ट्रॉफी स्पर्धेला उद्यापासून सुरुवात, अशी आहे 16 सदस्यीय टीम महाराष्ट्र
IND vs SA: केपटाऊन कसोटीबाबत दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे लक्षवेधी विधान, म्हणाला, ‘आम्ही या विकेटवर 100 धावाही…’