संपूर्ण भारत देशामध्ये शुक्रवारी (२३ जुलै) गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. भारतीय परंपरेनुसार आपल्या गुरुंना यादिवशी शिष्य वंदन करत असतात. भारतातील अनेक खेळाडूंनी सोशल मीडियाद्वारे सर्व भारतीयांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील आपले लहानपणीचे प्रशिक्षक दिवंगत रमाकांत आचरेकर यांच्या घरी जाऊन त्यांना नमन केले. या व्हिडिओची पोस्ट त्याने इंस्टाग्रामवरून शेअर केली.
सचिन गेला रमाकांत आचरेकर यांच्या घरी
जगभरातील क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे बाळकडू पाजणार्या रमाकांत आचरेकर यांचे २०१९ मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सचिन आचरेकर सरांच्या निवासस्थानी पोहोचला. त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आचरेकर सरांच्या प्रतिमेला वंदन करताना दिसत आहे.
सचिनने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहीले, ‘आचरेकर सरांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी आज त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्यासोबतच्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. माझ्या आयुष्यातील त्यांच्या योगदानासाठी आभार कमी पडतील.’
आपल्या कारकिर्दीच्या काळात देखील सचिन आचरेकर सरांना नेहमी भेट देत असतात.
विनोद कांबळीने केले अभिवादन
सचिनसह आचरेकर सरांचा दुसरा शिष्य असलेल्या विनोद कांबळी याने देखील आचरेकर सरांचा आठवणींना उजाळा देत, आपल्या गुरूंचे स्मरण केले. त्याने सचिनचे आणि स्वतःचे आचरेकर सरांसोबतचे छायाचित्र पोस्ट करताना लिहिले, ‘गुरु जो तुम्हाला आयुष्याचा मार्ग दाखवतो. आचरेकर सर आणि त्यांची शिकवण कधीही विसरणार नाही. मिस यु सर’
A guru is the one who teaches the way of life. Can never forget Achrekar sir and his teachings. Miss you sir! ❤️#GuruPurnima pic.twitter.com/ylLLoSll84
— Vinod Kambli (@vinodkambli349) July 23, 2021
आचरेकर सरांनी घडवले आहेत भारतीय क्रिकेटपटू
रमाकांत आचरेकर यांना क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हटले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, पारस म्हांब्रे, अजित आगरकर व समीर दिघे यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांना भारतीय सरकारकडून दोणाचार्य पुरस्कार मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व