सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबई येथे खेळला या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यासाठी प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, असे असले तरी वनडे क्रिकेटच्या भविष्याबद्दल कायमच चर्चा होत असते. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी वनडे क्रिकेटच्या याच भविष्याबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
वनडे क्रिकेटचे भविष्य धोक्यात आल्याचे सातत्याने बोलले जाते. लोक आता 50 षटकांचे वनडे क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुक नसल्याचे अनेक माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. अनेकदा वनडे मालिकांसाठी अपेक्षित प्रेक्षक देखील मैदानात गर्दी करत नाहीत. याच पार्श्वभूमीवर वनडे क्रिकेटमध्ये काहीसा बदल करण्याचे अनेक दिग्गजांनी सुचवले आहे. सचिन तेंडुलकर याने देखील नुकतेच वनडे क्रिकेटचे प्रारूप बदलण्याच्या शब्दांचा पुनरुच्चार केला. सचिन म्हणाला,
“आता खेळाडू देखील तितके वनडे क्रिकेट खेळण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसते. मी म्हणेल की वनडे क्रिकेट बदलण्याची वेळ नक्कीच आली आहे. यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकानंतर हा विचार करण्यात यावा. मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक संघाला प्रत्येकी 25 षटकांचे दोन डाव देण्यात यावेत. त्यामुळे खेळाची रंगत आणखी वाढेल. सध्या एका डावात दोन नवीन चेंडू देत असल्याने रिव्हर्स स्विंग कमी झाला आहे. याचा परिणाम देखील संघांवर होतो.”
वनडे क्रिकेटमधून अलीकडच्या काळात अनेक प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स यातील मोठे नाव असून, न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी वनडे क्रिकेटपेक्षा फ्रॅंचाईजी क्रिकेट खेळायला प्राधान्य दिले.
(Sachin Tendulkar Suggest Change ODI Cricket Format After INDvAUS ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील