भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने धूळ चारली. शुक्रवारी (दि. 11 मार्च) वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताच्या गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्व विभागाने चांगली कामगिरी केली. केएल राहुल याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारताला आव्हान गाठण्यात मदत झाली. अशात भारताकडून पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या अधिकतर फलंदाजांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती योग्य नव्हती. स्टॉयनिसनुसार, राहुलप्रमाणे फलंदाजी करायला पाहिजे होती.
काय म्हणाला स्टॉयनिस?
मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याच्या मते, मिचेल मार्श (Mitchell Marsh) याच्या फलंदाजीमुळे त्यांना वाटलं की, या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या केली जाऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो म्हणाला की, “ज्याप्रकारे मिचेल मार्श याने फलंदाजी केली, त्यामुळे आम्ही जर जास्तच उत्साहित झालो. आम्हाला वाटले की, इथे गरजेपेक्षा जास्त धावा केल्या जाऊ शकतात. मात्र, खेळपट्टी गोलंदाजांसाठी जरा फायदेशीर होती. आम्हाला आमच्या पद्धतीने खेळायला पाहिजे होते. माझ्या मते, केएल राहुल याने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती जास्त योग्य होती.”
खरं तर, 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत केएल राहुल (KL Rahul) याला खराब फॉर्ममुळे उपकर्णधारपदावरून हटवले होते. तसेच, उर्वरित दोन सामन्यांसाठी संघातूनही बाहेर केले होते. मात्र, त्याने वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात केली आहे. राहुलने पहिल्या वनडेत 91 चेंडूत नाबाद 75 धावांची विजयी खेळी केली. या धावा करताना त्याने 7 चौकार आणि 1 षटकारही मारला. यावेळी त्याने सहाव्या विकेटसाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत 108 धावांची भागीदारीही रचली. जडेजाने यावेळी 69 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारताने 5 विकेट्सने सामना जिंकला.
A gritty and resilient half-century by @klrahul ????????
His 13th in ODIs.
150 up for #TeamIndia
Live – https://t.co/8mvcwAvYkJ #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/CkpP7I3mRf
— BCCI (@BCCI) March 17, 2023
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाकडून फलंदाजी करताना फक्त मिचेल मार्श (Mitchell Marsh) यानेच सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूत 81 धावांची खेळी केली. मात्र, त्याच्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला कौतुकास्पद कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ 200 धावाही करू शकला नाही. त्यांना 35.4 षटकात 10 विकेट्स गमावत फक्त 188 धावाच करता आल्या.
भारतीय संघाने पहिला वनडे सामना जिंकून मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. तसेच, आता दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात पाहुणा संघ विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (ind vs aus 1st odi marcus stoinis praises kl rahul batting approach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील
आधी राहुलला नाही तसलं बोलला भारतीय दिग्गज, आता वादळी खेळी पाहून म्हणाला, ‘दबावातही चांगला खेळलास…’