---Advertisement---

‘आता काही दिवस फक्त रणजीच खेळ’, कोहलीला ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला

On: बुधवार, जुलै 13, 2022 3:16 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे तो विराट कोहलीचा खराब फॉर्म जो संपण्याचे नाव घेत नाही. केवळ चाहतेच नाही तर दिग्गज क्रिकेटपटूही कोहलीच्या फॉर्मबाबत केलेल्या वक्तव्यावर माजी कर्णधारावर जोरदार टीका करत आहेत. या मालिकेत आता भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणीचे नावही जोडले गेले आहे. सय्यद किरमाणी यांनी म्हटले आहे की, सध्या संघात खडतर स्पर्धा आहे आणि जर तुम्ही धावा केल्या नाहीत तर तुम्ही कितीही अनुभवी असलात तरी निवड समितीला कठोर निर्णय घ्यावा लागेल.

इंडिया टुडेशी बोलताना किरमाणी म्हणाले की, “निवडकर्त्यांना मोठा निर्णय घेण्याची गरज आहे. त्याने कोहलीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही धावा करून लय शोधायला सांगायला हवे. आजच्या काळात स्पर्धा खूप आहे. तुम्ही कितीही अनुभवी असलात तरीही काही डावांत तुम्ही कामगिरी करत नसाल, तर निवड समितीला ‘बस्स’ म्हणावं लागेल. देशांतर्गत क्रिकेट कडे परत जा. फॉर्ममध्ये या आणि मग आम्ही पाहू की तुम्ही भारतीय संघात परत येण्यास पात्र आहात का. विराट कोहलीला ते का लागू होत.“

किरमाणीआधी, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांनीही विराट कोहलीवर टीका केली आहे, जो दीर्घकाळापासून लयीसाठी झगडत आहे. कोहली जवळपास तीन वर्षांपासून मोठी खेळी खेळण्यासाठी झगडत आहे. कपिलने एबीपी न्यूजला सांगितले की, “जर तुम्ही कसोटीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या अश्विनला सोडू शकत असाल, तर जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडूही बाहेर बसू शकतो. मला कोहलीने धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे पण सध्या विराट कोहली ज्या प्रकारे आम्ही त्याला ओळखतो तसा खेळत नाही. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वत:चे नाव कमावले आहे आणि जर त्याने कामगिरी केली नाही तर आपण नवीन खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही.”

दरम्यान, विराट कोहलीच्या खराब फॉर्मची मालिका इंग्लंडमध्येही सुरूच आहे. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात कोहलीच्या बॅटमधून केवळ ३१ धावा आल्या. त्याच वेळी, टी२० मालिकेत माजी कर्णधाराच्या बॅटमधून १ आणि ११ धावा आल्या. मात्र, दुखापतीमुळे त्याला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढलंय! आयसीसी विश्वचषक २०२३ मधून बाहेर होण्याची शक्यता

इंग्लंडला हरवून टीम इंडिया ठरलीये पाकिस्तानपेक्षा वरचढं, क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान

‘ऑऊट ऑफ फॉर्म’ असणाऱ्या रोहित शर्माने ठोकली सर्वाधिक अर्धशतके, वाचा काय आहे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---