यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा कार्याकाळ संपणार आहे. असा अंदाज बांधला जात आहे की शास्त्री पुन्हा या पदासाठी अर्ज भरणार नाही आणि ते या पदावरही कायम राहणार नाही. अशीही चर्चा झाली की भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर संघाचे प्रशिक्षकपद संभाळलेला राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू शकतो. या सर्व चर्चांमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने त्याचे याविषयीचे मत व्यक्त केले आहे.
त्याने सध्याचा भारताचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड संघासाठी चांगला मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो, असे मत व्यक्त केले आहे.
सलमान बट्टच्या मते जो कोणी या पदावर येईल, त्याचा संघासोबत ताळमेळ असला पाहिजे. विक्रम राठोड संघासोबत जोडलेले आहेत आणि शास्त्रीच्या कार्याकाळात त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे तो एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच्यामते भारतीय संघाला एका प्रशिक्षकापेक्षा एका अशा व्यक्तीची गरज आहे, जो आधीपासूनचा संघ आणि त्याच्या चाललेल्या कार्यक्रमासोबत ताळमेळ बसवू शकेल. जर कोणी अन्य विदेशी प्रशिक्षक या पदासाठी अर्ज केला नाही, तर राठोड यांची नियुक्त होऊ शकते.
सलमान बट्टने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की, “जो कोणी नवीन मुख्य प्रशिक्षक बनेल, त्याने खेळाडूंसोबत योग्य ताळमेळ बसवला पाहिजे आणि त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलं पाहिजे. रवी शास्त्रीच्या उत्तराधिकारी म्हणून विक्रम राठोडचे नाव चर्चेत आहे. राठोड त्याच्या काळातील स्टाइलिश खेळाडू होता आणि तो सध्याच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षकही आहे. जेव्हा संघ मजबूत असतो, तेव्हा त्यांना प्रशिक्षकाची गरज नसते.”
“भारतीय संघाला एका अशा प्रशिक्षकाची गरज आहे, जो संघासोबत ताळमेळ बसवू शकेल. त्यामुळे मला वाटते विक्रम राठोड मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी उपयुक्त आहे. जर कोणी विदेशी प्रशिक्षकाने टी २० विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपल्यानंतर अर्ज केला नाही, तर ते या पदासाठी एकदम फिट आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये व्हावेत ‘हे’ फेरबदल, माजी इंग्लिश क्रिकेटरने निवडला संघ
भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…
यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी