भारतीय संघ सध्या आशिया चषकाची तयारी करण्यात व्यस्त आहे. आशिया चषकापूर्वीच जसप्रीत बुमराह दुखापतीने ग्रस्त झाल्याने त्याला आशिया चषकात समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर नेकांनी भारताला जसप्रीत बुमराहची कमी सतावेल अशी विधाने केली. मात्र, भारताचा माजी दिग्गज संजय बांगर याने या उलट मत व्यक्त केले आहे.
संजय बांगरला जसप्रीत बुमराहबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना तो म्हणाला की, “अर्शदीप हा उत्तम पर्याय आहे जो उत्तम यॉर्कर टाकतो. त्याच्याकडे खूप नियंत्रण आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याचा त्याचा स्वभाव चांगला आहे. त्यामुळे बुमराहची अनुपस्थिती डेथ ओव्हर्समध्ये टीमला फारशी उणीव भासणार नाही पण मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय टीमला त्याची उणीव नक्कीच जाणवेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तब्बल १७वर्षांनंतर होणाऱ्या बहुचर्चित कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी इंग्लंड जाणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर
९७ चेंडूच्या ‘दमदार’ खेळीत शुबमनकडून २४ वर्ष जुन्या विक्रमाला तिलांजली