केपटाऊन| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात न्यूलँड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांची मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी तिसऱ्या सामन्यातील विजयात किगन पीटरनने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले.
तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने ६३.३ षटकांत ३ विकेट्स गमावून पूर्ण केले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून किगन पीटरसनने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त रस्सी वॅन डर ड्यूसनने नाबाद ४१, कर्णधार डीन एल्गरने ३० आणि तेंबा बाऊमाने नाबाद ३२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या चौथ्याच दिवशी मालिकेवर कब्जा केला.
भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या तिघांना प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.
अधिक वाचा – राडाच राडा! ‘त्या’ घटनेनंतर विराटसह भारतीय खेळाडूंनी स्टंप माईकमधून ब्रॉडकास्टरवर काढला राग
तत्पूर्वी, या सामन्यात भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली होती. तसेच पुजाराने ४३ धावांचे योगदान दिले होते. दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या, त्याला मार्को यान्सिनची चांगली साथ मिळाली होती. यान्सिनने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदान कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ २१० धावांवर रोखत १३ धावांची आघाडी संघाला मिळवून दिली होती. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात देखील किगन पीटरसनने महत्त्वपूर्ण ७२ धावांची खेळी केली होती. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी एका बाजूने कोलमडत असताना दुसऱ्या बाजूने एकाकी झुंज देत रिषभ पंतने शतक साजरे केले होते. त्याने नाबाद १०० धावांची खेळी करत भारताला १९८ धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यामुळे १३ धावांच्या आघाडीसह भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे आव्हान ठेवले. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आणखी एका टी२० विश्वचषकाचे वाजले बिगुल; अतिमहत्त्वाच्या तारखांचा झाला खुलासा; तुम्हीही वाचा
ऑस्ट्रेलियाच्या कामी नाही आला ‘बचपन का याराना’, होबार्ट कसोटीत यजमानांची अतिवाईट सुरुवात
किती गोड!! पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटची वामिकासोबत मस्ती, व्हिडिओ व्हायरल