भारतीय क्रिकेटमध्ये ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २८ वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकवून दिला होता. तसेच २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकवून दिली होती. २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत धोनी पहिल्यांदाच कर्णधाराची भूमिका पार पाडण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र धोनीला हे कर्णधारपद नेमके मिळाले कसे?
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. पवार यांनी माजी खेळाडू चंदू बोर्डे याच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली. यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारतीय संघ २००७ साली इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी राहुल द्रविड संघाचा कर्णधार होता. याबाबत शरद पवार यांनी २००७ मधील घडलेल्या गोष्टींना उजाळा देत खुलासा केला आणि म्हटले आहे की, “राहुल द्रविड माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी कर्णधारपद सोडत आहे. नेतृत्वाचा परिणाम माझ्या फलंदाजीवर होत आहे. त्यावेळी मी सचिन तेंडुलकरला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले होते, परंतु त्याने देखील नकार दिला होता. त्यावेळी मी सचिनला म्हंटले की, जर तुम्ही दोघेही संघाचे नेतृत्व करण्यास नकार देत असाल तर परिस्थिती सुरळीत कशी होणार. त्यानंतर मला सचिनने म्हटले होते की, देशात असा एक खेळाडू आहे जो देशाचे नेतृत्व करू शकतो.तो दुसरा कोणी नसून एमएस धोनी आहे.” त्यांनतर सचिनच्या शिफारशीने धोनीला कर्णधार बनवण्यात आले होते.
शरद पवार हे २००५ पासून ते २००८ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. २००७ मध्ये वनडे विश्वचषकात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या लीग सामन्यांमधूनच बाहेर झाला होता. त्यामुळे चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती.
त्यानंतर २००७ मध्ये पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्या स्पर्धेत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी सहभाग घेतला नव्हता. अशातच धोनीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर युवा खेळाडूंना संघात संधी द्यायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेल्या धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने २००७ मधील टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील जिंकली होती. धोनीने भारतीय संघाच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. हाच धोनी ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली
आता मेंटर बनणार युवी? प्रतिष्ठित लीगमध्ये ‘या’ संघाने दिली ऑफर
पोरींनी नाव काढलं! तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडला लोळवत जिंकली वनडे मालिका; हरमनचा शतकी धमाका