---Advertisement---

मला चापट मारायला हवी होती..! श्रेयस अय्यरच्या कठोर बोलण्यावर शशांक सिंगचं मोठं विधान

---Advertisement---

क्वालिफायर 2 सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयसने (Shreyas iyer) त्यांच्याच संघातील स्टार फलंदाज शशांक सिंगला (Shashank Singh) मैदानात कठोर शब्दात त्याच्याशी वाद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला, त्यावर चर्चा सुद्धा सुरू झाल्या. आयपीएल 2025 (IPL 2025) संपल्यानंतर आता शशांक सिंगने (Shashank Singh) त्या घटनेवर प्रतिक्रिया देत मोठे वक्तव्य केले आहे. शशांक सिंगच्या वडिलांनी देखील सामन्यानंतर त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

शशांक सिंगने श्रेयस अय्यर विषयी मोठी गोष्ट केली आहे. मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये शशांक सिंग महत्वाच्या भूमिकेत त्याच्या चुकीमुळे रन आउट झाला होता. सामन्यानंतर श्रेयस अय्यरचा‌ या गोष्टीवर खूप संताप झाल्यानंतर त्याने शशांकला सुनावले होते.

आता या घटनेवर प्रतिक्रिया देत एक्सप्रेस स्पोर्ट्स इंटरव्यू दरम्यान शशांक सिंग म्हणाला, हो माझी चूक आहे. मला शिक्षा भेटलीच पाहिजे. श्रेयसने खरे तर मला चापट मारायला हवी होती. माझ्या वडिलांनी देखील फायनल होईपर्यंत माझ्याशी ते बोलले नाहीत. मी तेवढा चिंतेत नव्हतो, मी बागेत नाही तर मी समुद्रकिनाऱ्यावर फिरत होतो. हा एक महत्त्वपूर्ण काळ होता. श्रेयसने स्पष्ट केले होते की, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण नंतर श्रेयस मला जेवणासाठी बाहेर घेऊन गेला.

आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स (RCB vs PBKS) अंतिम सामन्यात शशांक सिंगने शानदार खेळी केली होती. शशांक सिंग पंजाबसाठी शेवटपर्यंत खेळत होता. त्याने 30 चेंडूत 61 धावा केल्या होत्या, पण तरीही पंजाब किंग्स चॅम्पियन बनू शकला नाही, त्याने या खेळीमध्ये 6 षटकार झळकावले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---