पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या कारकिर्दीत नेहमीच चर्चेत राहिला. त्याने स्वतःच्या वेगवान चेंडूमुळे अनेक खेळाडूंना दुखापतग्रस्त केले आहे. अख्तरच्या या घातक गोलंदाजीचे किस्से आजही सांगितले जातात. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसोबत बोलताना अख्तरने भारत आणि पाकिस्तान एक जुना किस्सा सांगितला. या सामन्यात त्यांचा संघ सौरव गांगुलीला जखमी करण्याच्या प्रयत्नात होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये मोहालीत झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला होता. सामन्यात शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला लक्ष केले होते. अख्तरने खुलासा केला आहे की, तो गांगुलीच्या बरगड्या मोडू इच्छित होता आणि त्याच उद्देशाने गोलंदाजी करत होता. अख्तर आणि विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) जुन्या किस्स्यांवर चर्चा करत होते, तेव्हा हा खुलास झाला.
चर्चेदरम्यान अख्तर म्हणाला की, “त्या सामन्यादरम्यान, मी चेंडू फलंदाजाच्या डोक्यावर किंवा बरगड्यावर मारण्याच्या प्रयत्नात होतो. गांगुलीच्या विरोधात देखील आम्ही हीच योजना बनवली होती. ही फक्त माझा नाही, पूर्ण संघाची योजना होती. संघाच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली होती. मला सांगितले गेले होते की, तुझ्याकडे गती आहे, तर विरोधी खेळाडूंना दुखापतग्रस्त कर. विकेट घेण्याचे काम दुसरे खेळाडू करतील.”
चर्चेदरम्यान सेहवाग अख्तरला म्हणतो की, गांगुली हा व्हिडिओ पाहत असेल. तो जेव्हा तुला भेटले तेव्हा याविषयी नक्कीच विचारेल. यावर अख्तरने खुलासा केला की, “मी सामना संपल्यानंतर लगेच गांगुलीशी याविषयी बोललो होतो. मी त्याला म्हटलेलो की, आमची योजना तुला बाद करण्याची नाही, तर इजा पोहोचवण्याची होती.”
मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार सौरव गांगुलीने सर्वाधिक ५७ धावांचे योगदान दिले, ज्याच्या जोरावर भारतीय संघ १९६ धावांपर्यंत कशीबशी मजल मारू शकला. यामध्ये रॉबिन सिंगने ४२, तर सबा करीमने १८ धावांचे योगदान दिले. विरेंद्र सेहवागने ७ व्या क्रमांकावर एक धाव केली होती, तर राहुल द्रविड एकही धाव करू शकला नव्हता.
पाकिस्तानचा सकलेन मुश्ताकने तीन, तर शोएब अख्तर आणि अजहर महसूत यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४२ षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला होता. एजाज अहमदने नाबाद ८९ धावांची, तर इंजमाम उल हकने नाबाद ६३ धावांची खेळी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Second ODI: मॅच विनिंग प्रदर्शनानंतरही दीपक चाहरला का बसवलं बाकावर? कारण आले पुढे
२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना
कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित