क्रिकेट विश्वातून मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. शनिवारी (दि. 20 मे) उत्तर प्रदेशच्या जौनपूर शहरातील पचहटिया गावात क्रिकेट खेळताना वाद झाला होता. यादरम्यान पूर्ववैमनस्यातून 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. मृत पावलेल्या मुलाचे नाव अंश असे होते. अंशच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आरोपीच्या घरी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही गावात भयान शांतता आहे. शवविच्छेदनानंतर मुलाच्या मृतदेहावर रविवारी सकाळी रामघाटावर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाला.
खरं तर, शनिवारी सायंकाळी पचहटिया गावात काही मुले क्रिकेट खेळत होते. यादरम्यान त्यांच्यात बाचाबाची झाली. रामालाल या व्यक्तीचा 18 वर्षीय मुलगा विशाल यादव याने रागाच्या भरात अंश (Ansh) याच्या डोक्यावर जबर मारहाण केली. यामध्ये त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. यावेळी तातडीने अंशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारा त्याचे निधन झाले. सूचना मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले.
यावेळी घाबरल्यामुळे आरोपी आणि इतर नातेवाईक घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान पोलिसांनी काही महिलांना चौकशीसाठी सोबतही नेले.
ग्रामस्थांच्या मते, ती सर्व मुले नेहमी एकत्र खेळायचे. खेळताना त्यांच्यात काय झाले काय माहिती आणि ही हृदयद्रावक घटना घडली. निधन झालेल्या अंशच्या घरी हंबरडा फोडला जात आहे. अंशला दोन लहान बहिणी आहेत. पोलीस अधिकारी संजय वर्मा यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. (shocking 12 year old ansh dies in brawl during cricket case filed against two people)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शीला की जवानी’गाण्यामुळे टिकटॉकवर फेमस झाला वॉर्नर, ऑस्ट्रेलियन सलामीवीराने स्वतः काढली आठवण
टीम इंडियातील रिंकूच्या निवडीविषयी सर्वांनी मांडली मतं, पण त्याला काय वाटतंय? वाचून कौतुकच कराल