---Advertisement---

श्रेयस अय्यरला पर्याय काय? आता जहीर खाननेही भारताच्या स्थितीवर केला सवाल

Shreyas-Iyer-And-Zaheer-Khan
---Advertisement---

भारतीय संघ मागील काही काळापासून आपल्या मधल्या फळीसाठी संघर्ष करत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादव हा तीन वेळा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. आता वेगवान गोलंदाज झहीर खान याने याविषयी मोठे भाष्य केले आहे. चला तर जाणून घेऊयात…

चौथ्या क्रमांकावर विचार करण्याची गरज
झहीर खान (Zaheer Khan) याच्या मते, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याची दुखापत आणि वनडेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सलग 3 सामन्यात पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती वनडे विश्वचषक 2019 (ODI World Cup 2019) स्पर्धेप्रमाणे झाली आहे. चार वर्षांपूर्वी विश्वचषकात भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाच्या स्थितीवर स्थायी फलंदाज शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. हेच कारण होते की, संघ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंतर पुढे जाऊ शकला नाही. वनडे विश्वचषक यावेळीही भारतात होत आहे. अशात जहीर खानला वाटते की, यजमानांना चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजी क्रमावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे.

‘आम्ही एकाच होडीत आहोत’
माध्यमांशी बोलताना जहीर खान म्हणाला की, “फलंदाजी क्रम हा असा आहे, ज्यावर त्यांना निश्चितरीत्या पुनर्विचार करावा लागेल. त्यांना पुन्हा चौथ्या क्रमांकाच्या पर्यायाचा शोध घ्यावा लागेल. अशीच चर्चा वनडे विश्वचषक 2019मध्येही झाली होती. आम्ही चार वर्षांबाबत चर्चा करत आहोत. आम्ही एकाच होडीत आहोत. होय, मला वाटते की, श्रेयस अय्यर हा तुमचा चौथ्या क्रमांकावरील नियमित फलंदाज होता. तुम्ही त्याला ती भूमिका आणि जबाबदारी घेताना पाहत आहात. मात्र, आता तो दीर्घ काळासाठी दुखापतग्रस्त असल्यामुळे तुम्ही वास्तवात या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.”

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यातील खराब कामगिरीनंतरही सूर्यकुमार यादव याला पाठिंबा दिला होता. (shreyas iyer injured now zaheer khan sends india warning over 2019 world cup problem)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोणत्या संघाचा गोलंदाजी अटॅक सर्वात भारी? माजी खेळाडूने घेतले ‘या’ संघाचे नाव, म्हणाला, ‘त्यांच्याकडे…’
‘मला त्याचा इतका राग आलेला, जेवढा त्रिशतक हुकल्यानंतरही आला नव्हता’, सेहवागचे विराटबाबत खळबळजनक भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---