इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून आता ३ संघ बाहेर पडले आहे. आधी मुंबई इंडियन्स, नंतर चेन्नई सुपर किंग्स आणि आता कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला. बुधवारी (दि. १८ मे) आयपीएलच्या ६६व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने- सामने होते. या सामन्यात लखनऊने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला फक्त २ धावांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवासह त्यांच्या प्लेऑफ मध्ये जाण्याच्या आशाही तिथेच संपल्या. या सामन्यात पराभूत होऊनही सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर त्याला दु:ख झाले नसल्याचे म्हणाला आहे.
श्रेयस अय्यरला का नाही झाले दु:ख?
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आपला संघ आयपीएल २०२२मधून बाहेर पडल्यानंतरही दुखी नाहीये. श्रेयस लखनऊविरुद्धच्या सामन्याला या हंगामातील सर्वोत्तम सामना मानतो. त्याने यावेळी संघाचा फलंदाज रिंकू सिंग याचेही तोंडभरून कौतुक केले. रिंकूबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला की, “मला अजिबात वाईट वाटत नाही. मी खेळलेल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक सामना होता. आपण ज्याप्रकारे आपले चारित्र्य आणि वृत्ती ठेवायला हवी होती, ते शानदार होते. रिंकूने ज्याप्रकारे आम्हाला शेवटपर्यंत नेले ते मला खूप आवडते, परंतु दुर्दैवाने दोन चेंडू शिल्लक असताना तो वेळ काढू शकला नाही, हे खरोखर दुःखी होते.”
“मला आशा होती की, तो आमच्यासाठी खेळ पूर्ण करेल आणि नायक होईल, परंतु तरीही त्याने चांगली खेळी खेळली आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. जेव्हा आम्ही आत आलो, तेव्हा मला असे वाटले नव्हते की, तो अशाप्रकारे खेळेल. कारण, खेळपट्टी कोरडी होती आणि गवत इतके ओले नव्हते. मला वाटले की, फिरकीपटूंना थोडी मदत होईल, पण ते काही शक्य झाले नाही,” असेही पुढे बोलताना श्रेयस म्हणाला.
संघाच्या प्रदर्शनावर श्रेयस अय्यर खुश
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२२ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला पराभूत करत केली होती. कोलकाताने या हंगामात १४ सामने खेळले, ज्यातील ६ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. दुसरीकडे, त्यांना ८ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अशा कामगिरीनंतरही अय्यर आपल्या कामगिरीवर खुश आहे.
याबाबत बोलताना अय्यर म्हणाला की, “पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्यानंतरही आमच्यासाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती होती, लक्ष्याचा पाठलाग करून ते शक्य तितके जवळ घेऊन त्यांच्यावर दबाव आणण्याची आमची मानसिकता होती. हे आमच्यासाठी चढ-उताराची परिस्थिती होती. आम्ही चांगली सुरुवात केली, पण सलग पाच सामने गमावले आणि मला वैयक्तिक वाटते की, आम्ही बरेच काही केले आणि बदलले, आम्हाला ते फॉर्ममुळे करावे लागले. मात्र, आम्हाला रिंकूसारखे खेळाडूही मिळाले.”
लखनऊ संघ आयपीएल २०२२च्या प्लेऑफ फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. पहिला मान गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने पटकावला होता. विशेष म्हणजे, लखनऊ आणि गुजरात हे या हंगामात नव्याने सामील झालेले संघ आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊचा २ धावांनी विजय, प्लेऑफसाठी मिळवली पात्रता
अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल
गेल, मॅक्यूलम सारखंच क्विंटन डिकाॅक हे नाव पण आदरानेच घ्या, कारण भावाने रेकॉर्डच तसा केलाय!