भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये ३ डिसेंबरपासून मुंबई येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना सध्या यजमानांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ५३९ धावांची आघाडी घेतली असून पाहुण्यांना विजयासाठी ५४० धावांचे आव्हान दिले आहे. परंतु यादरम्यान विराट कोहली आणि संघाला मोठे धक्के बसले आहेत. सामन्यातील शेवटच्या डावादरम्यान भारताकडून प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेले २ खेळाडू एकदाच मैदानाबाहेर झाले आहेत.
सलामीवीर मयंक अगरवाल आणि शुबमन गिल हेच ते खेळाडू असून दुखापतीमुळे ते न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी आलेले नाहीत. त्यांच्याजागी भारतीय संघाने इतर २ खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी मैदानात पाठवले आहे.
बीसीसीआयने यासंदर्भात माहिती देताना ट्वीट केले आहे की, ‘मयंक अगरवालला संघाच्या दुसऱ्या डावादरम्यान फलंदाजी करतेवेळी उजव्या हाताला चेंडू लागला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला क्षेत्ररक्षणासाठी पाठवण्यात आलेले नाही. त्याच्याबरोबरच शुबमन गिलही पहिल्या डावातील जखमेमुळे या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही. संघाच्या पहिल्या डावादरम्यान त्याच्या उजव्या हाताचे मधले बोट कापले गेले होते.’
UPDATE – Mayank Agarwal got hit on his right forearm while batting in the second innings. He has been advised not to take the field as a precautionary measure.
Shubman Gill got a cut on his right middle finger while fielding yesterday. He will not be taking the field today.
— BCCI (@BCCI) December 5, 2021
दरम्यान भारताच्या या दोन्ही सलामीवीरांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यातही पहिल्या डावात तर अगरवालने दीडशतक झळकावले होते. ३११ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने त्याने १५० धावा फटकावल्या होत्या. यासह तो या डावात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्याबरोबरच युवा सलामीवीर गिलनेही ४४ धावा जोडल्या होत्या. त्याच्यामध्ये या डावात पहिल्या विकेटसाठी ८० विकेट्सची भागिदारी झाली होती.
मात्र पुढील दुसऱ्या डावात गिल दुखापतीमुळे फलंदाजीसाठी आला नव्हता. त्याच्याजागी चेतेश्वर पुजाराला सलामीला पाठवले गेले होते. या डावात अगरवालने अर्धशतकी योगदान दिले होते. १ षटकार आणि ९ चौकारांच्या साहाय्याने त्याने ६२ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात ५४० धावांची भलीमोठी आघाडी मिळण्यामागे या सलामी जोडीचा मोठा हात राहिला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांनी साधला अनोखा योगायोग; धावफलकावर पहिल्यांदाच दिसले ‘हे’ चित्र
लेकर, कुंबळेनंतर मुरलीधरन असता १० गडी बाद करणारा गोलंदाज; पण संघसहकारीच ठरला ‘व्हिलन’
एजाजच्या फिरकीने घेतली ‘विराटसेने’ची गिरकी, १४ विकेट्स घेत फिरकीपटूने केले ‘हे’ मोठे विक्रम