टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित शर्माशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने लोकिकास साजेल अशी फलंदाजी केली नाही. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत आहे. याआधी तीन फलंदाज संघातून बाद होऊ शकतात. शुबमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये नसतील तर टीम इंडियाला पर्यायाची गरज भासू शकते.
शुबमन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलामीवीर म्हणून खेळला होता. पण त्याला विशेष काही करता आले नाही. गिल तिसऱ्या वनडेत अवघ्या 6 धावा करून बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या वनडेत 16 धावा करून गिल बाद झाला. तो फॉर्ममध्ये नसला तर टीम इंडियाला पर्यायाची नक्कीच गरज भासेल. गिल बराच काळ फॉर्मशी झुंजत आहे.
श्रेयस अय्यरने बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केला आहे. श्रेयस अय्यर श्रीलंका विरुद्धच्या तिन्ही सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा होता. परंतु तो या दरम्यान त्याला विशेष कामगिरी करता आले नाही. पहिल्या वनडेत 23 धावा करून अय्यर बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 8 धावा करता आल्या. मधल्या फळीसाठी टीम इंडिया अय्यरकडे पाहत आहे. मात्र सध्या त्याचा फॉर्म अडचणीत असल्याचे दिसत आहे.
केएल राहुल भारतीय संघाच्या अनुभवी फलंदांपैकी एक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो टीम इंडियासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला. पण तो विशेष काही करू शकलो नाही. राहुल एका सामन्यात 31 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या वनडेत तो शून्यावर बाद झाला. तो तिसऱ्या वनडेचा भाग नव्हता.
हेही वाचा-
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? आज रात्री इतक्या वाजता येईल निर्णय
टीम इंडियाचा प्रशिक्षक असताना द्रविडसाठी कोणती मालिका अवघड? स्वत:च केला मोठा खुलासा
..तर या कारणामुळे रिकी पाँटिंगनं दिल्ली कॅपिटल्सशी नातं तोडलं; स्वत:च केला धक्कादायक खुलासा