आयपीएल २०२०च्या प्लेऑफमध्ये मजल मारुनही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात त्यांचा ६ विकेट्सने पराभव झाला. यासाठी त्यांची वाईट फलंदाजी कुठे-ना-कुठे जबाबदार ठरली. याविषयी आता आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी मोठे वक्तव्य केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातच आरसीबीची फलंदाजी सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे.
फलंदाजीत झाले बिघाड
कॅटिच म्हणाले की, “हंगामातील सुरुवातीच्या १० सामन्यांपर्यंत आमची गाडी रुळावर होती. पण मागील ४ सामन्यात आमच्या फलंदाजीत बिघाड होत गेले. चांगल्या सुरुवातीनंतर संघाचे बळ हळूहळू संपत गेले आणि आमचा वाईट शेवट झाला.”
हैदराबादचे केले कौतुक
तसेच हैदराबादच्या प्रदर्शनाची प्रशंसा करत कॅटिच यांनी सांगितले, “हैदराबादचे कौतुक करायला पाहिजे. त्यांनी आरसीबीला पूर्ण सामन्यात दबावाखाली ठेवले. आम्हाला वाटले की आम्ही गुणफलकावर १५० धावा नोंदवल्या. तरीही आम्ही सामन्यात टिकून राहू शकतो. कारण आमच्याकडे २ लेग स्पिनर गोलंदाज होते आणि खेळपट्टी धिम्या गतीची होती. तसेच गोलंदाजांना सोईस्कर टर्नदेखील खेळपट्टीवर मिळत होता. परंतु वास्तवात आम्ही १३० धावा करु शकलो. त्यामुळे आमचे प्रदर्शन खूप निराशादायी राहिले.”
का केले फलंदाजी क्रमवारीत बदल ?
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ऍरॉन फिंचऐवजी कर्णधार विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे फलंदाजी क्रमवारीत जास्त बदल केल्यामुळे संघाचे नुकसान झाले का? याविषयी कॅटिच यांनी माहिती दिली.
ते म्हणाले की, “आम्ही संघात जास्त बदल केले नाहीत. वरची फळी ठरलेली होती. फिंचला ११व्या सामन्यापर्यंत अंतिम ११च्या संघात स्थान देण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने तो अपेक्षेप्रमाणे जास्त धावा करु शकला नाही. त्यामुळे प्ले ऑफचे सामने सुरू झाल्यानंतर आम्ही विराटला सलामीला पाठवायचे ठरवले. पण आमचा हा निर्णयही अपयशी ठरला.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘संघनिवड’ ही बेंगलोरची मुख्य समस्या, माजी दिग्गजाने प्रश्न केले उपस्थित
जेव्हा विराट कोहली स्वतः लाच म्हणाला होता ‘उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज’, पाहा व्हिडिओ
‘ते’ चार खेळाडू म्हणजे SRHचे ‘चार मिनार’, माजी दिग्गजाने सांगितली नावे
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा