विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. आशिया चषकामध्ये २८ ऑगस्ट रोजी होणारा पाकिस्तान विरुद्धचा सामना हा माजी कर्णधार विराट कोहलीचा १००वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध भारताचा हा पहिला सामना आहे.
एप्रिलमध्ये रवी शास्त्री यांनी कोहलीला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा आणि आवश्यक वाटल्यास आयपीएल न खेळण्याचा सल्ला दिला होता. शास्त्री म्हणाले की, “मी अलीकडे कोहलीशी बोललो नाही, पण मोठे खेळाडू नेहमी वेळेवर सावध होतात. आशिया चषकापूर्वी घेतलेला ब्रेक त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये तो आत्मपरीक्षण करेल. लोकांची स्मरणशक्ती खूपच कमी आहे आणि जर त्याने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक केले तर लोक सर्वकाही विसरतील.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकात टीम इंडियातील हे तिघे पाजणार फक्त पाणीच; एकाच नशीब येणार आडवं
नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया