चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी चाहत्यांना धक्का दिला होता. त्याने ट्वीट करत सांगितले होते की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. रायुडूच्या अशा अचानक निवृत्तीच्या घोषणेने सर्वच हैराण झाले. चर्चा एमएस धोनी याच्या निवृत्तीची होती, पण रायुडूने सर्वांना हैराण केले. चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल किताबावर आपले नाव कोरले. तसेच, रायुडूला विजयासह निरोप दिला.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super kings) संघापुढे अंतिम सामन्यात विजयासाठी 15 षटकात 171 धावा होत्या. हे आव्हान चेन्नईने शानदार फलंदाजी करत मिळवले. या विजयात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करून संघाला विजयी केले. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) यानेही या सामन्यात मोलाचे योगदान दिले.
काय म्हणाला रायुडू?
विजयानंतर सामना आणि कारकीर्दीविषयी बोलताना रायुडू भावूक झाला. तो म्हणाला की, “खूप चांगले वाटत आहे. यापेक्षा आणखी चांगली भावना काय असू शकते की, आम्ही शेवटच्या सामन्यात स्पर्धा जिंकलो. माझ्याकडे आता शब्द नाहीयेत. मी फक्त सामना सुरू होण्याची वाट पाहत होतो आणि आशा करत होतो की, एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी करावी.”
शेवटच्या दोन चेंडूंवर चेन्नईला विजयासाठी 10 धावांची गरज होती. त्यावेळी जडेजाने एक षटकार आणि एक चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यावेळी संघाचे वातावरण कसे होते याविषयी रायुडू बोलला. तो म्हणाला की, “आम्ही फक्त प्रार्थना करत होतो. जड्डूने लाजवाब फिनिश केला. हे कोणत्याही परिकथेचा अंत वाटतो.”
एमएस धोनीशी काय चर्चा झाली?
एमएस धोनी आणि अंबाती रायुडू (MS Dhoni And Ambati Rayudu) यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याविषयी प्रश्न केला असता रायुडू म्हणाला की, “बस, काही नाही. ते म्हणाले की, ‘हा जो शॉट तू मारला आहे, तो तू म्हातारा झाला तरी आठवशील.'”
रायुडूचे योगदान
मोहित शर्मा याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर रायुडूने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. मात्र, तिसऱ्या चेंडूवर बॅकफूटवरून मारलेला षटकार जबरदस्त होता. हा आखुड टप्प्याचा चेंडू होता आणि रायुडूने बॅकफूटवर जाऊन तो ऑफ साईडला मारला. त्याने यादरम्यान त्याने 8 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, हे त्याचे सहावे आयपीएल विजेतेपद होते. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून 2010 ते 2017 यादरम्यान खेळताना आयपीएल विजेतेपद जिंकले होते. याविषयी तो म्हणाला की, “आजचा दिवस माझ्या कारकीर्दीतील सर्वात यादगार दिवस राहील.”
रायुडूने या संपूर्ण हंगामात 16 सामने खेळताना 15.80च्या सरासरीने 158 धावा केल्या. या धावा करताना नाबाद 27 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली. (skipper ms dhoni told ambati rayudu this after hitting six in ipl 2023 final against gujarat titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हृदयस्पर्शी व्हिडिओ! आख्खी टीम ट्रॉफीभोवती नाचत होती, पण धोनी रात्री 3.30वाजता चाहत्यांच्या जवळ जात होता
धक्कादायक! धोनी ऑटोग्राफ देत नव्हता म्हणून चाहरने केली BCCIच्या उपाध्यक्षाकडे तक्रार? पाहा व्हिडिओ