मँचेस्टर। 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला उपांत्य सामना आज राखीव दिवशी सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 240 धावांचे आव्हान ठेवले आहे.
पण या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांच्या विकेट्स चार षटकांच्या आत 5 धावांवर असतानाच गमावल्या.
भारताने या पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतर पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला होता. पण त्यावेळी अनेकांनी भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी फलंदाजीला येईल अशी अपेक्षा होती. मात्र दिनेश फलंदाजीला आला.
हे पाहून भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीने आश्चर्य व्यक्त केले आहे. दिनेश जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा समालोचन करत असलेला सौरव गांगुली म्हणाला, ‘हे समजणे अवघड आहे. अजूनही धोनी फलंदाजीला आला नाही.’
‘तिथे आहे धोनी. त्याच्या 10 हजार 500 पेक्षा अधिक धावा आहेत. त्याची सरासरी 50 आहे आणि तो भारत दबावात असताना अजून आलेला नाही. हे स्विकारहार्यच नाही. मला माहित आहे तो चांगला फिनिशर आहे. पण हे सामना संपण्याच्या खूप दूर आहे.’
‘भारताला त्याच्या अनुभवाची, क्षमतेची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत तूम्हाला त्याच्या फलंदाजीच्या अनुभवाची गरज आहे, ही एक परिस्थिती आहे. जर तूमचे 25 धावांवर 3 किंवा 4 विकेट असतील तर तूम्हाला सर्वात अनुभवी फलंदाजाची गरज असते.’
या सामन्यात भारताने पहिल्या तीन विकेट्स गमावल्यानंतर कार्तिकनेही 6 धावांवर विकेट गमावली. तर खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर रिषभ पंतने आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 32 धावा करत विकेट गमावल्या. यानंतर रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीने भारताचा डाव सांभाळला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वनडे क्रिकेटच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली
–रविंद्र जडेजाने जबरदस्त थ्रो करत केले रॉस टेलरला धावबाद, पहा व्हिडिओ
–संघात एकवेळ स्थान न मिळालेल्या जडेजाने संघासाठी वाचवल्या ४१ धावा