भारतीय क्रिकेटमध्ये (Indian cricket team) गेल्या काही महिन्यात अनेक मोठे बदल झाले आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) तीनही स्वरूपात कर्णधार पदावरून माघार घेतली आहे. वनडे आणि टी२० साठी कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. तर लवकरच कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल याची देखील घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान कसोटी संघातून दिग्गज खेळाडूंची सुट्टी होऊ शकते, ज्याचे संकेत बीसीसीआय अध्यक्षांनी दिले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १ दशकापासून विराट कोहली, चेतेश्वर पुजारा( Cheteshwaar pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु गेल्या २ वर्षांपासून हे तीनही फलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. विराट कोहली कर्णधार असल्यामुळे आणि त्याची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहता, त्याची संघाबाहेर होण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे महत्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. हेच कारण आहे की, लवकरच या दोन्ही दिग्गजांना भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
भारतीय संघाला वेस्ट इंडीज संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येईल. यादरम्यान सर्वांचे लक्ष अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारावर असणार आहे. परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (sourav ganguly) संघ जाहीर करण्यापूर्वीच संकेत दिले आहेत की, पुजारा आणि रहाणे यांना आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये.
हे वाचा : “मला नाही वाटत वेंकटेश अय्यर अधिक यशस्वी होईल..” माजी भारतीय क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रीया
सौरव गांगुली यांनी स्पोर्टस्टार सोबत बोलताना म्हटले की, “ते दोघेही खूप चांगले खेळाडू आहेत. मला आशा आहे की, ते रणजी ट्रॉफी खेळतील आणि खूप धावा करतील. मला विश्वास आहे ते नक्की करून दाखवतील. यात काही अडथळा येईल असे मला वाटत नाही. रणजी ट्रॉफी खूप महत्वाची स्पर्धा आहे. आम्ही सर्वांनी या स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ते दोघे देखील रणजी ट्रॉफी खेळतील आणि चांगली कामगिरी करतील.”
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची कामगिरी पाहता,त्यांना संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. हे दोघे बाहेर झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी सारख्या फलंदाजांचा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल. हनुमा विहारी गेल्या ३ वर्षांपासून भारतीय संघात स्थान टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. तर श्रेयस अय्यरने नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या :
इंग्लंड क्रिकेटमध्ये वादळ! ऍशेस मालिकेतील पराभवानंतर ‘या’ सदस्याने दिला राजीनामा
ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या उपकर्णधार शेख राशिदची प्रेरणादायी कहाणी
बीसीसीआय अध्यक्षांकडून आली खुशखबर! आयपीएल व महिला आयपीएलबाबत दिली महत्वपूर्ण अपडेट