बीसीसीआय (BCCI) ने आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारतीय संघाचा टी-२० आणि एकदिवसीय प्रकारातील कर्णधार घोषित केले. बीसीसीआयने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागचे कोणतेच कारण स्पष्ट केले नव्हते. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर चाहत्यांची नाराज उघड झाली होती. अशात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी यामागचे कारण आणि संघाच्या भविष्याविषयी मत मांडले आहे.
गांगुलींनी यापूर्वीच सांगितले होते की रोहितला टी२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी मिळून घेतला आहे. याबाबतीच गांगुलींना प्रश्न विचारला गेला की, हा निर्णय कशाप्रकारे भारतीय संघासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल.
क्रिकेट नेक्टशी बोलताना गांगुलींनी या प्रश्नाचे उत्तर दिले की, “जसे मी सांगितले की, मी वैयक्तित पातळीवर त्याला (विराट) विनंती केली होती की, त्याने टी-२० संघाचे नेतृत्व सोडू नये. उघड आहे, त्याला कामाच्या व्याप जाणवला. ठीक आहे, तो एक महान क्रिकेटपटू आहे. तो त्याच्या क्रिकेटबाबतीत खूप गंभीर आहे. त्याने मोठ्या काळापासून कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे, या गोष्टी होत राहतात. कारण मी देखील मोठ्या काळापर्यंत नेतृत्व केले आहे, त्यामुळे मला माहीत आहे.”
गांगुली पुढे म्हणाले की, “निवडकर्त्यांना देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकच कर्णधार हवा होता आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला. मला नाही माहिती की, भविष्यात काय होणार आहे. पण जसे की मी सांगितले, हा एक चांगला संघ आहे आणि यात काही अप्रतिम खेळाडू आहे. मला आशा आहे की परिणाम चांगले येतील.”
पुढे गांगुलींना विचारले गेले की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकच कर्णथार कशासाठी ? जेव्हा एकाच चेंडूने वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळले जाते. यावर गांगुली म्हणाले, एका चांगल्या संघाचे खूप सारे नेते नसतात. शक्यतो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये एक कर्णधार ठेवण्यामागे हेच कारण आहे.
रोहितच्या क्षमतेबद्दल गांगुली म्हणाले की, “यात कसलीच शंका नाही, यासाठी निवडकर्त्यांनी त्याचे समर्थन केले आहे. तो चांगली कामगिरी करण्यासाठी मार्ग शोधेल आणि मला आशा आहे की, तो हे करेल. आयपीएलमधील त्याचे रेकॉर्ड चांगले आहे. त्याने पाच जेतेपद जिंकले आहेत. त्याने काही वर्षांपूर्वी एशिया चषकात भारताचे नेतृत्व केले होते, ज्यामध्ये भारत जिंकला होता आणि तेव्हा भारतीय संघ विराटशिवाय जिंकला होता. विराटच्या गैरहजेरीत जेतेपद जिंकणे, हे दाखवते की, संघ किती मजबूत आहे. रोहितला मोठ्या स्पर्धेत यश मिळाले आहे. त्याच्याकडे एक चांगला संघ आहे. आशा आहे की तो अधिक चांगले परिणाम आणू शकतो.”
भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातील सामन्यांना २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! महत्त्वाच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या प्रमुख ३ खेळाडूंना कोरोनाची लागण
भारतीय क्रिकेटचा युवराज घडवणारे ‘ड्रॅगन सिंग’
‘त्या’ दौऱ्यानंतर पूर्णपणे खचून गेला होता विराट, रवी शास्त्रींचा उलगडा