---Advertisement---

मेलबर्न कसोटीतील विजयानंतर सौरव गांगुलीने ट्विट करत केले भारतीय संघाचे अभिनंदन, म्हणाला…

---Advertisement---

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखत विजय मिळविला. तसेच या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अॅडलेड कसोटीतील ३६ धावांवर पराभूत झाल्याची जखम मागे टाकत भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. या दमदार कामगिरीमुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी भारतीय संघाची भरभरून स्तुती केली. या यादीत आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचाही समावेश झाला आहे.

ट्विटरवरून दिल्या शुभेच्छा 

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळवलेल्या या विजयाने गांगुली खुश झाल्याचे दिसला. त्याने ट्विट करत संघाचे अभिनंदन केले. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, “मेलबर्न क्रिकेट मैदानावर मिळवलेला हा विजय अतिशय खास आहे. भारतीय संघाला नेहमीच इथे खेळायला आवडते. शाब्बास अजिंक्य रहाणे! चांगले लोक कायमच पहिल्या क्रमांकावर येतात. रवींद्र जडेजा, आर अश्विनसह सगळ्या खेळाडूंचे अभिनंदन. पुढील दोन सामन्यांसाठी शुभेच्छा!”

भारताचा संस्मरणीय विजय 

पहिला कसोटी सामना हरल्यामुळे मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मात्र स्वप्नवत पुनरागमन केले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे कुशलतेने नेतृत्व केले. त्याने पहिल्या डावात ११२ धावांची झुंजार शतकी खेळी करत फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. गोलंदाजांनी पहिल्या कसोटीची लय कायम राखत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दोन्ही डावात अनुक्रमे १९५ आणि २०० धावांवर सर्वबाद केले. पदार्पणवीर शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी लक्षवेधी कामगिरी केली. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा, ऑफस्पिनर आर अश्विन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपापल्या भूमिका सुयोग्य पार पाडत भारताचा विजय सुनिश्चित केला.

महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– गंभीर पाठोपाठ आता या भारतीय क्रिकेटपटूनेही केला भाजपात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---